Advertisement

उद्यानविद्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सूनगांव येथे केले वृक्षारोपण.


प्रतिनिधी नागेश भटकर 
जळगाव (जा), ता. १५ तालुक्यातील गावं ,सूनगांव येथे ,स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे उद्यानविद्या , जळगाव जामोद . या महाविद्यालयातील बी. एससी. (ऑनर्स) उद्यानविद्या मधील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी 'रावे' (ग्रामीण उद्यानविद्या कायानुभव) उपक्रमातंर्गत "मेरी माटी, मेरा देश" व १५ ऑगस्ट क्रांती दिवसाचे औचित्य साधून ७५ वृक्षांचे वृक्षारोपण करून स्वातंत्र्य लढ्यातील वीरांना आदरांजली वाहिली.या प्रसंगी सुनगाव ग्रामपंचायत कार्यालया अंतर्गत येणाऱ्या शाळेच्या आवारात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जिल्हापरिषद शाळेच्या प्रांगणात, ग्रामपंचायत परिसरात तथा रस्त्याच्या दुतर्फा व स्मशान भूमी मध्ये वृक्षारोपण करण्यात आले . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच श्री. रामेश्वर अंबळकार हे लाभले. तसेच प्रमुख उपस्थितीत ग्रामसेवक श्री. हितेंद्र जोशी व जिल्हापरिषद शाळेतील प्राचार्य श्री. पि.एम. नेवारे आणि ग्रामपंचायत सदस्य श्री. विनोद ढगे व समस्त गावकरी मंडळी व सर्व उद्यानविद्या महाविद्यालयाचे विध्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी करण्या करिता 
 मिलिंद क्षीरसागर ,विवेक कवळे,देवांग केने ,सचिन लाटे,शशिकांत खंडारे,ओम महाले,गुरुदास कूकडे
प्रणव इंगळे ,नितीन काळदाते, परिक्षीत काळे, फराझ हॅक,अनिकेत गिरी या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विशाल तायडे, उपप्राचार्य प्रा. सतिश धर्माळ, कार्यक्रम अधिकारी 
प्रा. प्रितेश वानखडे व विषय तज्ञ प्रा. जिव्हेश साळी यांचे मार्गदर्शन लाभले .

Post a Comment

0 Comments