Advertisement

जळगाव जामोद येथील उद्यानविद्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आझादी का अमृतमहोत्सव या कार्यक्रमा अंतर्गत स्वच्छ भारत अभियान राबवले

प्रतिनिधी नागेश भटकर
दिनांक:१५/०८/२०२३
जळगाव जामोद: तालुक्यातील वडगाव पाटण येथे स्वातंत्रविर गणपतराव इंगळे उद्यानविद्या महाविद्यालयातील बि. एससी.(ऑनर्स) उद्यानविद्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी ‘रावे’ (ग्रामीण उद्यानविद्या कायार्नुभव) आझादी अमृतमहोत्सव व स्वतंत्रता दिवस या निमित्त स्वच्छ भारत अभियान राबविण्यात आले . या प्रसंगी वडगाव पाटण येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
रस्त्याच्या कडेला स्वच्छ्ता करण्यात आली. यावेळी तिथे समस्त गावकरी मंडळी व सर्व उद्यानविद्या महाविद्यालयाचे विद्यार्थी होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रेरणा भन्साली ,पायल बोडखे, प्रगती चोपडे, पुजा हागे , गायत्री इंगळे , पुजा जगताप, निकिता जंजाळ,श्रुतिका कांबळे, विद्या लोथे व इतर विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला ग्रामस्थांची उपस्थिती होती. ग्रामीण उद्यानविद्या कायार्नुभव अंतर्गत या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विशाल तायडे, उपप्राचार्य प्रा. सतिश धर्माळ, कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रितेश वानखडे व विषय विशेषज्ञ प्रा. जिव्हेश साळी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments