Advertisement

जळगाव जामोद येथील उद्यानविद्या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी केले अंधश्रद्धा निर्मूलन

प्रतिनिधी नागेश भटकर
दिनांक:१५/०९/२०२३ जळगाव जामोद: तालुक्यातील वडगाव पाटण येथे स्वातंत्रविर गणपतराव इंगळे उद्यानविद्या महाविद्यालयातील बि. एससी.(ऑनर्स) उद्यानविद्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी ‘रावे’ (ग्रामीण उद्यानविद्या कायार्नुभव) अंधश्रद्धा यावर एक पथनाट्य सादर केले . त्या नाटकात त्यांनी सांगितले की मांजर आडवी जाणे, लिंबू आणी मिरची लावणे, इ. गोष्टी हा सर्व अंधश्रध्देच्या भाग आहे. यावेळी तिथे समस्त गावकरी मंडळी व त्या गावचे सरपंच सौ. रश्मीताई घुले उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रेरणा भन्साली ,पायल बोडखे, प्रगती चोपडे, पुजा हागे , गायत्री इंगळे , पुजा जगताप, निकिता जंजाळ,श्रुतिका कांबळे, विद्या लोथे व इतर विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. ग्रामीण उद्यानविद्या कायार्नुभव अंतर्गत या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विशाल तायडे, उपप्राचार्य प्रा. सतिश धर्माळ, कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रितेश वानखडे व विषय विशेषज्ञ प्रा. जिव्हेश साळी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments