Advertisement

मौलाना आझाद विचार मंचने केला पत्रकारांचा सत्कार.

मौलाना आझाद विचार मंचने केला पत्रकारांचा सत्कार.
प्रतिनिधी जळगाव जामोद
लोकशाहीमध्ये पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असे म्हटले जाते पत्रकार हा समाजाचा आरसा असतो समाजात घडणाऱ्या चांगल्या वाईट घटनांना आपल्या लेखणी द्वारे सर्व समाजासमोर आणत असतो. बदलत्या जमान्यात डिजिटल युगामध्ये पत्रकारांवर फार मोठी जबाबदारी आलेली आहे या जबाबदारीचे भान ठेवून पत्रकारांनी गोरगरीब शोषित वंचितांना न्याय देण्यासाठी आपल्या लेखणीचा उपयोग करावा असे प्रतिपादन. मौलाना आझाद विचार मंच चे जिल्हाध्यक्ष हाजी मुजमील खान यांनी जळगांव जामोद येथे केले.

पत्रकार दिनानिमित्त व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार भवन ज जा येथे मौलाना आझाद विचार मंच च्या वतीने कर्तुत्वान पत्रकारांचा छोटेखानी कौटुंबिक सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. 

यावेळी मार्गदर्शन करताना हाजी मुजम्मिल खान हे बोलत होते या कार्यक्रमाला उपस्थित ज्येष्ठ पत्रकार गुलजार खा पठाण ,अभिमन्यू भगत,जयदेव वानखडे,शमीम देशमुख,अर्शद इकबाल,शिवदास सोनोने,प्रीतम ठाकूर,संजय दांडगे,विनोद वानखडे,गणेश भड, गोपाल अवचार,राजेश बाठे,अनिल भगत,सागर झनके, नागेश भटकर,शेख युनूस,गौतम गवई,   यांचा हाजी मुजम्मिल खान यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.
 अतिशय छोटेखानी झालेल्या या सत्कार सोहळ्याला पत्रकारांचे सत्कार करण्या करिता मौलाना आझाद विचार मंच बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष बाबू भाई जमदार,अझहर देशमुख,मजहर खान, चांद ठेकेदार उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments