*बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्त करण्यासंदर्भात जळगाव जामोद येथे भारतीय बौद्ध महासभा व वंचितचे राष्ट्रपतींना निवेदन*
जळगाव जामोद प्रतिनिधी....
बुद्धगया बिहार येथील महाबोधी महाविहार मुक्त करण्यासंदर्भात बुद्धगया येथे सुरू असलेल्या आंदोलनाला जळगाव जामोद भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडीने निवेदन देत पाठिंबा दिला आहे.भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बिहारचे मुख्यमंत्री तसेच महामहिम राष्ट्रपती भारत सरकार यांना जळगाव जामोद उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत महाबोधी महाविहार मुक्त करण्या संदर्भात निवेदन देण्यात आले आहे.
सदर निवेदनामध्ये बुद्धगयातील महाबोधी महाविहार १९४९ च्या १३,२५ आणि २६ अनुषेदानुसार न्यायाची मागणी तसेच व्यवस्थापन ॲक्ट मध्ये तात्काळ दुरुस्ती करावी या ॲक्ट मुळे बुद्धगया येथील महाबोधी महाविहार व्यवस्थापनामध्ये इतर धर्मियांची संख्या जास्त असल्यामुळे महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन योग्यरित्या होत नसल्याने जगभरातील बौद्ध अनुयायामध्ये असंतोषाचे वातावरण असल्यामुळे महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन बौद्ध धर्मियांच्या हाती देण्यात यावे व बुद्धगया महाबोधी महाविहार येथे सुरू असलेल्या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनातील सर्व मागण्या मंजूर करण्यात येऊन जगभरातील व विदेशातील बौद्ध बांधवाच्या भावनेचा विचार व आदर करून तात्काळ बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्त करण्यात यावे हि मागणी करण्यात आली निवेदन देतेवेळी भारतीय बौद्ध महासभेचे जळगाव जामोद तालुकाध्यक्ष जगदीश हातेकर, सरचिटणीस सुभाष सिरसाट,संघपाल गुरचळ, आनंद लहासे, परमेश्वर पारवे,बौध्दाचार्य द्याराम सोनोने, सुभाष शेगोकार, मधुकर गवई, तानाजी गवई , जिल्हा सचिव रवि नाईक,देवाभाऊ दामोधर, गुलाबराव आठवले, सागर गवई,बी एन वानखडे, साहेबराव भगत,रतन नाईक, सुरेश वाघोदे, रवींद्र पारवे, रमेश इंगळे यांच्यासह भारतीय बौद्ध महासभेचे व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
0 Comments