Advertisement

धनगर समाजातील युवकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ दोषींवर कठोर कारवाई करण्याकरिता खामगाव तहसीलदार यांना दिले निवेदन


धनगर समाजातील युवकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ दोषींवर कठोर कारवाई करण्याकरिता खामगाव तहसीलदार यांना दिले निवेदन

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील मौजे आणवी या गावातील धनगर समाजातील कैलास बोऱ्हाडे या धनगर बांधवावर गावगुंडांनी अमानुष हल्ला केला व त्यांना लोखंडी सळ्या गरम करून अंगावर चटके देण्यात आले. तशीच दुसरी घटना मंठा तालुक्यातील ठेंगे वडगाव या गावांमध्ये काही समाज कंठकांनी धनगर समाजाचे एका गरीब मजुरी करणारे कुटुंबातील विलास अंकुश धुमाळे याला मारहाण करून खून केला आहे अशा निर्दयी गावगुंडांना मोका लावून हद्दपार करण्यात यावे या मागणीचे निवेदन धनगर समाजाच्या न्याय हक्कासाठी  आक्रमकपणे लढणारी संघटना यशवंत सेना महाराष्ट्र राज्य सरसेनापती आदरणीय श्री माधव भाऊ गडदे साहेब यांच्या मार्गदर्शनात व आदेशानुसार आज 6-03-2025 ला माननीय श्री उपविभागीय अधिकारी साहेब उपविभाग कार्यालय खामगांव*
यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडवणीस साहेब, व उपमुख्यमंत्री आदरणीय श्री एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय श्री, अजित दादा पवार साहेब यांना निवेदन,
त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी प्रद्धतीची मागणी केली व माननीय मुख्यमंत्री साहेबांनी या आरोपीला मोका लावून कडक कारवाई करावी.
अशी मागणी यशवंत सेनेच्या वतीने सेनेच्या वतीने देण्यात आली यावेळी यशवंत सेना बुलढाणा जिल्हा युवक जिल्हाध्यक्ष अंबादास माने, रवींद्र दादा गुरव, आनंदराव नागे सर, गोपाल भाऊ तारडे, संतोष भाऊ आटोळे, निलेश भाऊ सपकाळ, ज्ञानेश्वर भाऊ वरखेडे, निवृत्त नागे साहेब, श्रिहरी डांगे, संतोष भाऊ ढेकळे, गुलाबराव हटकर, अर्जुन भाऊ आदबाने, सुनिल भाऊ नेमाडे, गजानन भाऊ दिवनाले, दिलीपराव गुरव, व सर्व समाज बांधव उपस्थित होते

Post a Comment

0 Comments