Advertisement

बेटावद बेटावद येथे पांझरा नदीकाठी संरक्षण भिंतीसाठी महिलांची मागणी

*बेटावद बेटावद येथे पांझरा नदीकाठी संरक्षण भिंतीसाठी महिलांची मागणी.* शिंदखेडा तालुक्यातील जळगाव व धुळे जिल्ह्याला जोडणारे गाव व तसेच तालुक्यातील मोठे गाव म्हणून प्रसिद्ध असलेले पांझरा नदीच्या काठी वसलेले बेटावद येथे पांझरा नदीकाठी वास्तव्यास असलेल्या नागरिकांना आता पुराच्या पाण्याचा धोका संभवतो आहे.यामुळे येथे संरक्षक भिंत बांधण्यात यावी अशी पाटील वाड्यातील महिला वर्गाने आपल्या लेखी निवेदन ग्रामपंचायत बेटावद येथे दि 27 /8/22 वार शनिवार रोजी सादर केले. बेटावद गावाला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मागच्या बाजूपासून ते थेट स्मशानभूमीपर्यंतच्या भागाला संरक्षण भिंतीची गरज असल्यामुळे तेथे संरक्षक भिंत बांधली जावी म्हणून मागणी होत आहे.कारण, पांझरा नदीला ज्याही वेळी पूर येतो त्या सर्व पाण्याचा प्रवाह हा बेटावद गावाकडे असल्यामुळे येथील नदीकाठी असलेली गाळाची माती ही दिवसेंदिवस खचत असल्यामुळे भविष्यात या ठिकाणी काही मोठी अपरिहार्य घटना घडल्यास कोण जबाबदार असेल ? असाही सवाल नागरिक विचारत आहे. प्रत्येक निवडणुकी वेळी लोकप्रतिनिधी या ठिकाणी येतात संरक्षक भिंती विषयी लोकांना आश्वासन देतात मात्र निवडणूक झाली की पुन्हा पाच वर्षे या गोष्टीकडे बघत नाहीत.यामुळे येथील नागरिकांनी आता दाद कुणाकडे मागावी असा मोठा यक्ष प्रश्न येथील रहिवाशांसमोर उपस्थित होतो. तरी या गोष्टीकडे स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासन झोपेचे सोंग करते आहे की काय असाही सवाल उपस्थित होत असतो. तरी स्थानिक प्रशासन व इतर कामात व्यस्त लोकप्रतिनिधी यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. निवेदन देते वेळी मीना शितोळे, मंगलाबाई पवार,संगीता पवार,रेणुका निकम, भारती निकम, सीमा निकम,वैशाली पवार,मंगलाबाई पवार,माधुरी देशमुख,जिजाबाई कोळी,लक्ष्मीबाई कोळी,आरस्तोलबाई कोळी,सुनीता पवार आदी उपस्थित होते.*बेटावद बेटावद येथे पांझरा नदीकाठी संरक्षण भिंतीसाठी महिलांची मागणी.* शिंदखेडा तालुक्यातील जळगाव व धुळे जिल्ह्याला जोडणारे गाव व तसेच तालुक्यातील मोठे गाव म्हणून प्रसिद्ध असलेले पांझरा नदीच्या काठी वसलेले बेटावद येथे पांझरा नदीकाठी वास्तव्यास असलेल्या नागरिकांना आता पुराच्या पाण्याचा धोका संभवतो आहे.यामुळे येथे संरक्षक भिंत बांधण्यात यावी अशी पाटील वाड्यातील महिला वर्गाने आपल्या लेखी निवेदन ग्रामपंचायत बेटावद येथे दि 27 /8/22 वार शनिवार रोजी सादर केले. बेटावद गावाला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मागच्या बाजूपासून ते थेट स्मशानभूमीपर्यंतच्या भागाला संरक्षण भिंतीची गरज असल्यामुळे तेथे संरक्षक भिंत बांधली जावी म्हणून मागणी होत आहे.कारण, पांझरा नदीला ज्याही वेळी पूर येतो त्या सर्व पाण्याचा प्रवाह हा बेटावद गावाकडे असल्यामुळे येथील नदीकाठी असलेली गाळाची माती ही दिवसेंदिवस खचत असल्यामुळे भविष्यात या ठिकाणी काही मोठी अपरिहार्य घटना घडल्यास कोण जबाबदार असेल ? असाही सवाल नागरिक विचारत आहे. प्रत्येक निवडणुकी वेळी लोकप्रतिनिधी या ठिकाणी येतात संरक्षक भिंती विषयी लोकांना आश्वासन देतात मात्र निवडणूक झाली की पुन्हा पाच वर्षे या गोष्टीकडे बघत नाहीत.यामुळे येथील नागरिकांनी आता दाद कुणाकडे मागावी असा मोठा यक्ष प्रश्न येथील रहिवाशांसमोर उपस्थित होतो. तरी या गोष्टीकडे स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासन झोपेचे सोंग करते आहे की काय असाही सवाल उपस्थित होत असतो. तरी स्थानिक प्रशासन व इतर कामात व्यस्त लोकप्रतिनिधी यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. निवेदन देते वेळी मीना शितोळे, मंगलाबाई पवार,संगीता पवार,रेणुका निकम, भारती निकम, सीमा निकम,वैशाली पवार,मंगलाबाई पवार,माधुरी देशमुख,जिजाबाई कोळी,लक्ष्मीबाई कोळी,आरस्तोलबाई कोळी,सुनीता पवार आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments