Advertisement

रसलपुर रस्त्याने सुरू असलेल्या पुलांचे काम अर्धवट.. ठेकेदाराच्या मनमानीचा शेतकऱ्यांना फटका शेतकऱ्यांनी घेतली आक्रमक भूमिका...

रसलपुर रस्त्याने सुरू असलेल्या पुलांचे काम अर्धवट.. ठेकेदाराच्या मनमानीचा शेतकऱ्यांना फटका... शेतकऱ्यांनी घेतली आक्रमक भूमिका...
जळगाव जामोद प्रतिनिधी:- 
सबका साथ सबका विकास सबका विश्वास या मोदी सरकारच्या धोरणातून लोकसभा निवडणुकीपूर्वी अनेक विकास कामांची सुरुवात करण्यात आली आहे... गाव तिथे रस्ता , शेतकऱ्यांसाठी पाणंद रस्ते असे विविध विकासकामे निकृष्ट दर्जाचे जळगाव जामोद मतदारसंघात सुरू आहेत.... परंतु विकास कामाची गती संथ असल्याने याचा फटका सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे वास्तव जळगाव जामोद तालुक्यात दिसून येत आहे...तालुक्यात विविध विकास कामाचे वाटप करताना विशिष्ट ठेकेदारानाच कामाचे कंत्राट मिळत असल्याने जळगाव जामोद तालुक्यातील एका मोठ्या कंत्राट दाराकडे आज रोजी पाच ते सहा मोठ मोठ्या कामांचे कंत्राट आहे.... परंतु यातील काही कामे अर्धवट तर अनेक कामांची सुरुवातच झाली नसल्याचे समजते....कामाचं भूमिपूजन करावं मोठा खड्डा खोदावा यावरच ठेकेदार स्वतःला धन्य समजतात... याचीच प्रचिती तालुक्यातील जळगाव रसलपुर रस्त्यावर दिसून येत आहे.... जळगाव जामोद ते रसलपुर रस्त्यावर तीन पुलाचे कामे सुरू असून त्यामधील दोन पुलावर फक्त खड्डा खोदून ठेवल्याने शेतकरी तसेच रस्त्याने येजा करणाऱ्या नागरिकांसाठी हि मोठी डोकेदुखी ठरत आहे....
या रस्त्यावरील पूल क्रमांक दोन लगत ततारपूर शिवारातील गट नंबर 44 मधील शेतकरी अब्दुल हमीद अब्दुल माजिद यांचे शेत आहे.... पुलाच्या अर्धवट कामामुळे 15 जून रोजी आलेल्या मुसळधार पावसामध्ये पुराचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात शिरल्याने सदर शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.... या शेतकऱ्याच्या शेतातील कपाशीचे पीक पूर्णपणे नष्ट झाले असून जमीन खरडून गेल्याने शेतकऱ्यांची चिंता आणखीच वाढली आहे.... 
तसेच शेतालगतच सुरू असलेल्या अर्धवट पुलाच्या कामामुळे रहदारीचा पर्यायी रस्ता सुद्धा याच शेतकऱ्याच्या शेतातून जात असल्याने शेतकऱ्याचे अजूनही प्रचंड नुकसान होत असल्याचे दिसून येते...
 या मोबदल्यात शेतकऱ्याला शासनाकडून कोणतीही आर्थिक मदत मिळालेली नाही.... पुलाचे खड्डे खोदून तीन ते चार महिन्याचा कालावधी उलटला तरीही संबंधित ठेकेदाराने बांधकाम सुरू न केल्याने संबंधित ठेकेदार व प्रशासना विरोधात रसलपुर ग्रामस्थ व रस्त्यालगत असणारे शेतकरी कमालीचे वैतागले आहेत.... केवळ आपल्या कमिशन साठी प्रशासन अशा मुजोर ठेकेदारांविरोधात कोणतीही कारवाई करत नसल्याचे वास्तव या निमित्ताने समोर आले आहे.... तर रस्ता आणि त्यावरील पुलांचे बांधकाम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे अपेक्षित असताना केवळ ठेकेदारांची मुजोरी मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने असे प्रकार घडत आहे....
 रसलपुर ते जळगाव जामोद या रस्त्याच्या बाबतीत सुद्धा असाच प्रकार घडल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे..... यामुळे रसलपुर परिसरातील शेतकरी कमालीचे त्रस्त झाले असून येत्या तीन दिवसांत संबंधित ठेकेदाराने या रस्त्यावरील पुलाच्या कामा संदर्भात ठोस उपाय योजना न केल्यास रस्त्यालगत असलेले नुकसानग्रस्त शेतकरी रसलपुर कडे जाणारा रस्ता बंद करणार असा इशारा शेतकऱ्यांच्या वतीने प्रशासनाला देण्यात आला आहे..

Post a Comment

0 Comments