*राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने राज्यातील विविध मतदार संघात घोंगडी बैठक*
दि.1 सप्टेंबर.2024
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी सेलच्या वतीने महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघांमध्ये घोंगडी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रातील विविध मतदार संघात 29 ऑगस्ट. 2024 ते 2 सप्टेंबर . 2024 दरम्यान घोंगडी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांच्या नेतृत्वात 18 वक्ते सहभागी झाले होते. घोंगडी बैठकीच्या माध्यमातून पक्षाचे ध्येय धोरण आणि राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांचे गेल्या पन्नास वर्षातल्या राजकारणात महाराष्ट्रासाठी दिलेले योगदान आणि ओबीसीसाठी केलेल्या कामासंदर्भात माहिती या बैठकीच्या माध्यमातून देण्यात आली आहे. घोंगडी बैठकीचा दुसरा टप्पा 11 सप्टेंबर 2024 ते 16 सप्टेंबर 2024 दरम्यान होणार आहे या दुसऱ्या टप्प्याच्या दरम्यान महाराष्ट्रातील 44 विधानसभा मतदार संघात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचं अनुषंगाने दिनांक 27/9/2024 पासून 2/10/2024 सलग 5 दिवस बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार ) पक्षाचे ईच्छुक उमेदवार तथा बुलढाणा जिल्हा कार्याध्यक्ष प्रसेनजीत पाटिल यांच्या सहकार्याने मतदारसंघातील 50 गावात शिव,फुले, शाहू, आंबेडकर विचाराची वारी, गावाच्या दारी अभियान घोंगडी बैठकीच्या माध्यमातून ओबीसी सेलचे वक्ता डॉ.शिवाजी विसपुते व किरण पवार यांनी राबविले.
*घोंगडी बैठकांतून घ्यावयाचे मुद्दे*
१) बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवरायांचे स्वराज्याचे विचार, फुले शाहू आंबेडकरांचे पुरोगामी विचार .
२) आदरणीय श्री शरदचंद्रजी पवार साहेबांचे गेल्या पन्नास वर्षातल्या राजकारणात महाराष्ट्रासाठी दिलेले योगदान
३) महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून आदरणीय श्री शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वात राज्यासाठी घेतले गेलेले महत्वपूर्ण निर्णय आणि भूमिका
४) या महाराष्ट्रातल्या संत थोर पुरूषांच्या आत्मचरित्राचा सत्ताधा-यांनी केलेला घोर अवमान
५) आदरणीय श्री शरदचंद्रजी पवार साहेबांसोबत झालेली गद्दारी, महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला मदमस्त सत्ताधा-यांनी लावलेली काळीमा
६) ओबीसींचे अराक्षण टिकवण्यासाठी तसेच समाजातल्या सर्वागीण घटकांच्या विकासासाठी आवश्यक असलेली जातीनिहाय जनगणना, ही आपल्या पक्षाची ओबीसी प्रर्वगातील उपेक्षित घटकांसाठीची प्रमुख मागणी,
७) विश्वकर्मा समाजासाठी असलेले आर्थिक महामंडळ तथा कुंभार समाजाला आश्वासित केलेले मातीकला बोर्ड तर नाभिक समाजाला आश्वासित केलेले केश कर्तनालय बोर्ड किंवा महाज्योती संस्था अश्या व इतर महामंडळांच्या माध्यमातून ओबीसी प्रवर्गातील घटकांना आवश्यक असलेली आर्थिक निधी राज्य सरकारकडून पुरवला जात नाही.
८) राज्यातील बिघडलेल्या परिस्थितीत सामाजिक सलोखा राखण्याच्या आणि सामाजिक ऐक्य ठिकवण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या पक्षाची भूमिका
९) सत्ताधा-यांच्या चुकीच्या कारभारामुळे राज्यातील शेवटच्या घटकांच्या मनात राज्यसरकारच्या बददल कमी होत चाललेली विश्वासार्हता आणि वाढत चाललेली असहिष्णूता
१०) ओबीसी प्रवर्गातील दुर्लक्षित घटकांना अठरा पगड जातींना पक्ष संघटनेसोबत जोडणे .
११) स्थानिक पातळीवर करण्यात आलेली समाज उपयोगी कामे जनसामान्यांपर्यत पोहोचवत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष आणि आदरणीय श्री शरदचंद्र पवार साहेबांची नाळ सर्वसामान्य लोकांसोबत घट्ट करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न तसेच सामाजिक ऐक्यासाठी गावागावात लोकांमध्ये संवाद घडवून आणला जाईल .
0 Comments