*शेतकऱ्यांनीआधुनिक शेतीसह जैविक शेती ही काळाची गरज, जैविक शेती करण्यावर भर द्यावा- अतुल जाधव*
शेगांव : ता. शेगांव, जि. बुलढाणा
सेंद्रिय शेती दिवसेंदिवस रासायनिक व हानिकारक कीटकनाशकांचा खते अतिवापरामुळे शेताच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात होणारी घट व मानवाच्या जीवनाला होणाऱ्या नुकसानापासून वाचवण्यासाठी नवभारत फर्टीलायझर चे कृषी अधिकारी अतुल जाधव, किरण वाघ , विवेक जाधव , सतीश खर्चे यांनी तिवान ता.शेगाव जि.बुलढाणा येथील शेतकऱ्यांनाजैविक शेती व सेंद्रिय शेती बद्दल माहिती दिली. खरीप हंगामातील पिकांसाठी कापूस या पिकावरील पडणाऱ्या रसशोषक
किडींचा बंदोबस्त करण्यासाठी प्रथम जैविक औषधाचा वापर करावा त्यामुळे रसशोषक किडींचा प्रादुर्भाव होणार नाही, अती रासायनिक खतांचा अती वापर कमी करून जैविक खताचा वापर वाढवला पाहिजे त्यामुळे जमिनीतील मित्र कीटकांची संख्या ही वाढते त्यामुळे जमिनीमध्ये हवा खेळती राहते त्यामुळे पिकाचे उत्पादन ही वाढते, खरीप पिकांचे कापूस व सोयाबीन पिकाबद्दल अतुल जाधाव व किरण वाघ यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात गावातील शेतकरी वर्गातून श्री. पृशोत्तम लांजुडकर, तेजराव पहुरकर, गजानन लांजुडकर व इतर शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
0 Comments