Advertisement

बच्चु कडु,दिपक केदार व प्रशात डिक्कर यांचा २५ एप्रिल रोजी जळगावात संयुक्त आक्रोश मोर्चा..

बच्चु कडु,दिपक केदार व प्रशात डिक्कर यांचा २५ एप्रिल रोजी जळगावात संयुक्त आक्रोश मोर्चा..
*भ्रष्ट व्यवस्थे विरोधात, तीनही तोफा एसडीओ कार्यालयावर धडकणार, प्रशासनही हादरले*

जळगाव/ भ्रष्ट व्यवस्थेला वठणीवर आणण्यासाठी व सत्तेतील मस्ताळेल समाजकंटकांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चु कडु,ऑल इंडिया पॅंथर सेनेचे दिपकभाई केदार व स्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या प्रमुख उपस्थित २५ एप्रिल २०२५ रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय जळगाव जा. येथे लोकशाही बचाओ आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. माजी मंत्री बच्चुभाऊ कडु यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांची सत्ताधारी आमदारांना जाणिव करुन देण्यासाठी ११ एप्रिल रोजी राज्यभर पुकारलेल्या आंदोलनला पाठिंबा देण्यासाठी पक्ष आदेशानुसार प्रहार कार्यकर्त्यांनी आमदार संजय कुटे यांना मागण्यांचे निवेदन घेऊन जातांना जळगाव येथील त्यांच्या निवासस्थाना समोर पोहचताक्षणी तीथे उपस्थित असलेले आ.संजय कुटे यांचे खासगी पि ए प्रकाश राऊत यांनी आंदोलकाच्या गळ्यात असलेल्या निळे दुपट्ट्याचा राग मनात धरुन आंदोलक सौरभ बावस्कर व त्यांचे सहकाऱ्यांना जातीयवादक शिविगाळ करुण मारहाण केली. त्या मारहाणी बाबत पोलिसात रितसर तक्रार देऊनही कारवाई होत नसल्याने या भ्रष्ट व्यवस्थेच्या व मस्ताळेल समाजकंटकांना धडा शिकविण्यासाठी २५ एप्रिल रोजी एस. डी.ओ. कार्यालयावर आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चासाठी बच्चुभाऊ कडु,दिपकभाई केदार व प्रशांत डिक्कर हे अन्याय विरोधात राज्यभरात बंड पुकारणारे तीनही नेते एकत्रित येत असल्यामुळे जिल्ह्यातील प्रशासन चांगलेच हादरले आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी गावगाडा,वाड्या वस्त्या  व घरा घरातील शेतकरी शेतमजूर, महिला बघीनींनी व युवकांनी बहुसंख्येने मोर्चात सहभागी व्हा असे आवाहन आकाश वानखडे, सिध्दार्थ तायडे,प्रतिक गांवडे,आकाश तायडे,पवन शेंडे,अरुण निंबोळकार,प्रमोद गव्हाळे यांनी केले आहे.

अहिल्या न्यूज चॅनल चे कार्यकारी संपादिका सौ, सरला ताई राजेंद्र ससाणे,

Post a Comment

0 Comments