नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवाव्यात
तिवसा तालुक्याच्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना निर्देश ः खासदार बळवंतराव वानखडे, माजी मंत्री अॅड. यशोमतीताई ठाकूर यांनी ऐकल्या नागरिकांच्या समस्या
प्रतिनिधी,
अमरावती,ता. २२ : उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ग्रामीण भागातील भारनियम, पाणी टंचाई तसेच नागरिकांच्या अन्य समस्यांवर बुधवारी (ता.२२) तिवसा तहसील कार्यालयाच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत चर्चा करण्यात आली. नागरिकांना भेडसाविणाऱ्या विविध समस्यांवर तातडीने उपाययोजना करम्याच्या सूचना खासदार बळवंतराव वानखडे तसेच माजी मंत्री आणि तिवसा मतदारसंघाच्या माजी आमदार अॅड.यशोमतीताई ठाकूर यांनी आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्यात. यावेळी तहसीलदार मयूर कळसे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी श्री. बोरसे, तिवसाचे गटविकास अधिकारी अभिषेक कासोदे यांच्यासह तिवस्याच्या नगराध्यक्षा प्रतिभा गौरखेडे , उपनगराध्यक्षा प्रिया विघ्ने , दिलीपराव काळपांडे , योगेश वानखडे , शिवदास मुसळे,
रितेश पांडव, लुकेश केने, मुकुंद पुनसे, संदीप आमले, वैभव वानखडे, राकेश चौधरी, पंकज कळंबे, संदीप ठाकरे, सूरज धुमनखेडे, सतीश पोजगे, शहजाद पटेल, छत्रपती डोंगरे, प्रणव वानखडे, अमर वानखडे, शशांक राउत, रामू तांबे, नितीन अर्डक, खरेदी विक्रीचे सभापती सुरेश मेटकर, बाजार समितीचे सभापती रवी राउत, यांच्यासह खविंसचे संचतालक , सभापती व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीला काश्मिरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली देण्यात आली. यावेळी संपूर्ण सभागृह स्तब्ध झाले होते.
सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी तसेच महिलांच्या अनेक समस्यांना घेवून जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार बळवंतराव वानखडे यांच्या अध्यक्षतेखाली माजी मंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी सर्वप्रशासकीय विभागांना एकाच छताखाली आणण्यासाठी आढावा बैठकांचे धडकसत्र सुरू केले असून तिवसा तालुक्याच्या समस्यांना घेवून बुधवारी (ता.२३) तहसील कार्यालयात तालुका आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याला नागरिकांनी उत्सफुर्त प्रतिसाद दिला. विविध विभागांशी संबंधित समस्यांना घेवून सर्वसामान्य नागरिक, महिला याठिकाणी आल्या होत्या. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना खासदार बळवंत वानखडे यांनी त्या समस्या तातडीने निकाली काढण्याच्या सूचना दिल्यात. तिवसा तालुक्यातील प्रशासकीय कार्यालये तसेच विविध विभागांशी संबंधित समस्याना घेवून आजची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. आढावा बैठकीत महसूल विभाग (भातकुली तहसील), पंचायत समिती, वीज वितरण कंपनी, कृषी विभाग, घरकुल निर्माण संबंधी अडचणी, पाणी टंचाई, रोजगार हमी योजना, बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, स्वच्छ भारत मिशन, महिला व बालकल्याण विभाग, शिक्षण विभाग, पशुसंवर्धन विभाग, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, उर्ध्व वर्धा प्रकल्प, पाटबंधारे विभाग, उमेद-माविम, सामाजक वनीकरण विभाग, तसेच तालुक्यातील विविध शासकीय कार्यालये तसेच विभागांचा आढावा खासदार बळवंतराव वानखडे तसेच माजी मंत्री अॅड. यशोमतीताई ठाकूर यांनी घेतला .
------------
0 Comments