Advertisement

300 वाहनांची गगनभेदी शोभायात्रा, स्त्रीशक्तीचा जागर आणि अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दी जयंतीचा भव्य उत्सव

ऐतिहासिक “पुण्यश्लोक अहिल्यादेवी जागरण रॅली”ने महाराष्ट्राचे लक्ष वेधले – 300 वाहनांची गगनभेदी शोभायात्रा, स्त्रीशक्तीचा जागर आणि अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दी जयंतीचा भव्य उत्सव

जळगाव, दि. ३० मे:
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेली “अहिल्या संदेश जागरण यात्रा” आणि महिला मॅरेथॉन स्पर्धा जळगाव शहरात अत्यंत भव्य, उत्साही आणि ऐतिहासिक स्वरूपात पार पडली. संस्कृती, नारीशक्ती आणि धर्म-न्याय या मूल्यांचा जागर करणाऱ्या या यात्रेने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले असून, या दिवशी जळगावचा इतिहास नव्याने घडला असेच म्हणावे लागेल.


जळगावातून भव्य शोभायात्रेला प्रारंभ

जीएस ग्राउंड (शिवतीर्थ मैदान), जळगाव येथून प्रारंभ झालेल्या या शोभायात्रेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून करण्यात आली. यानंतर राज्याचे वरिष्ठ मंत्री मा. ना. गिरीशभाऊ महाजन यांच्या हस्ते आणि मार्गदर्शनाखाली रॅलीचे औपचारिक उद्घाटन झाले. विशेष बाब म्हणजे, त्यांनी स्वतः पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या रथाचे सारथ्य करत ऐतिहासिक परंपरेला साजेसा सन्मान दिला.

भव्य रचनेतील रॅली आणि मार्ग

तब्बल 300 चारचाकी वाहनांचा सहभाग लाभलेल्या या भव्य रॅलीने नेरी, जामनेर, बोदवड, मुक्ताईनगर, वरणगाव, दीपनगर, भुसावळ, साकेगाव आदी भागांतून पुढे जात डॉ. उल्हास पाटील कॉलेज, गोदावरी फाउंडेशन, जळगाव येथे समारोप केला. ठिकठिकाणी पुष्पवृष्टी, ढोलताशांच्या गजरात आणि भगव्या झेंड्यांच्या लाटांनी स्वागत करण्यात आले. महिला भगिनींचा उत्स्फूर्त सहभाग, पारंपरिक वेशभूषा आणि घोषणांनी ही शोभायात्रा जागतिक पातळीवर लक्षवेधी ठरली.


प्रमुख मान्यवरांची उपस्थिती

या ऐतिहासिक यात्रेस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम क्षेत्र कार्यवाह बाळासाहेब चौधरी, आमदार राजू भोळे, आमदार सुरेश भोळे, भाजप जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, महानगराध्यक्ष राधेश्याम चौधरी, उद्योगपती अशोकभाऊ जैन, माजी महापौर गुलाबराव देवकर, उज्वलाताई बेंडाळे, जिल्हा संयोजक अरविंदभाऊ देशमुख, महिला मोर्चा उपाध्यक्षा केतकी पाटील, प्रदेश सचिव रेखा वर्मा, जिल्हाध्यक्ष भारती सोनवणे, युवा मोर्चा अध्यक्ष महेश पाटील, इत्यादींसह अनेक मान्यवर, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
धनगर समाजाचे विशेष योगदान

मल्हार सेनेचे सुभाषभाऊ सोनवणे, संदीपभाऊ तेली, अ‍ॅड. कृषी सोनवणे, संजय पाटील, तुळशीराम सोनवणे, अरुण ठाकरे, प्रभाकर नाकदे, रमेश सुलताने यांच्यासह धनगर समाजाच्या असंख्य बांधवांनीही या यात्रेला आपली ऊर्जा आणि उपस्थितीने भव्य स्वरूप दिले.

सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि ऐतिहासिक संदेश

या जागरण यात्रेने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची दूरदृष्टी, लोकाभिमुख राज्यकारभार, धार्मिक सहिष्णुता, न्यायनिष्ठता आणि स्त्रीशक्तीचा सन्मान या मूल्यांचा प्रचार व प्रसार करून समाजात नवी ऊर्जा दिली आहे. मराठा साम्राज्याच्या सुवर्ण परंपरेचा पुनर्जागर करणारी ही रॅली केवळ एक शोभायात्रा नसून, एक सांस्कृतिक चळवळ बनली आहे.

Post a Comment

0 Comments