Advertisement

बालविवाह प्रतिबंधासाठी स्वाक्षरी मोहिमेस प्रारंभ बाल विकास कार्यालय जळगाव जामोद येथे जनजागृती कार्यक्रम

बालविवाह प्रतिबंधासाठी स्वाक्षरी मोहिमेस प्रारंभ बाल विकास कार्यालय जळगाव जामोद येथे जनजागृती कार्यक्रम

जळगाव जामोद:-

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर होणारे बालविवाह रोखण्यासाठी  चालू  असलेली जिल्ह्यातील स्वाक्षरी मोहिमेची वाटचाल सुरूच आहे. या मोहिमेचा शुभारंभ जळगाव जामोद येथे दि.२ मे ला बाल विकास समितीचे अधिकारी तथा अध्यक्ष  डॉ मनोज डांगे व समिती सदस्य सौ.जयश्री शिंदे,एड.वर्षा पालकर,राणे व सपकाळ यांच्या स्वाक्षरी ने सुरुवात बाल विकास समिती कार्यालय येथे करण्यात आली.स्वक्षरी मोहिमेच्या माध्यमातून बालविवाहाचे दुष्परिणाम समजावून देत, मुलांचे शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षितता याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. जिल्हा प्रशासन व अस्मिता इन्स्टीट्यूट फॉर डेव्हलपमेंट  यांच्या संयुक्त पुढाकारातून ही मोहिम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात नागरिकांनी बालविवाहास थारा देऊ नये आणि समाजात बालविवाहविरोधी संदेश पोहोचवावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.


अहिल्या न्यूज चॅनल करिता कार्यकारी संपादिका सौ सरला ताई राजेंद्र ससाणे ची बातमी

Post a Comment

0 Comments