आपले संपूर्ण आयुष्य समाजाला अर्पण करणारे उंबरे (द) गावचे विद्यमान सरपंच मा. श्री. विष्णुपंत नारनवर हे उंबरे दहीगाव या गावाला लाभलेले एक रत्न आहेत. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजाला आतापर्यंत दिले आहे तसेच गावचा विकास हा एकच ध्यास मनात ठेवून तो ध्यास पूर्ण करण्यासाठी अहोरात्र कष्ट करण्याची तयारी ठेवणारे तसेच गावातील सर्वसामान्य गोरगरीब जनतेला कोणतीही कसलीही अडचण आल्यास आहे त्या परिस्थितीमध्ये त्याच्याजवळ पोहोचून त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करतात. तसेच उंबरे द. या गावचा सुपुत्र म्हणून मी या गावाला काहीतरी देणे पडतो हा विचार मनात ठेवून गावच्या विकासासाठी जिथून मिळेल त्या ठिकानावरून गावासाठी निधी मंजूर करून आणून रस्ते, वीज, घरकुल, पाण्याच्या जागोजागी टाकी, वॉटर फिल्टर अशी बऱ्याच प्रकारची कामे करून गावचा विकास करण्यासाठी नेहमी अग्रेसर असतात. तसेच प्रत्येक सामाजिक संघटनेमध्ये भाग घेऊन त्याला पाहिजे तेवढी मदत विष्णुपंत नारनवर करण्याचा प्रयत्न करतात. येत्या पाच वर्षात विष्णुपंत नारनवर यांनी गावात भरपूर खूप काही सुविधा आणल्या व गावचा अमुलाग्र बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच गाव पातळीवर कोणताही कसलाही तंटा झाल्यास ते पोलीस स्टेशन मध्ये न जाता गाव पातळीवर मिटवण्याचा पुरेपूर प्रयत्न करून दोन्ही पक्षांमध्ये समंजसपणा आणण्याचे कार्य हे पंतांनी आतापर्यंत केलेले आहे. व गावातील रुग्ण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असल्यास ते कमी खर्चात कसे बरे होऊन घरी परतेल याची पूर्णपणे काळजी विष्णुपंत नारनवर यांनी आजपर्यंत केली आणि इथून पुढेही करतील. गावातील तरुणांना नोकरी व व्यवसाय यासाठी प्रेरित करून त्यांना चांगले मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न नेहमी करत असतात असे हे आमचे गावचे सरपंच विष्णुपंत नारनवर यांच्या रूपाने गावाला एक अनमोल रत्न लाभले आहे.
0 Comments