सावळदबारा येथे बारावीच्या परीक्षा शांततेत
✍️ सोयगाव औरंगाबाद प्रतिनिधी सुनील चव्हाण👈
सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथे:४ मार्चपासून इयत्ता बारावीच्या परीक्षेस सुरुवात झाली आहे.गेल्या दोन वर्षापासुन कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे परीक्षा रद्द करण्यात आली होती. यावर्षी आता शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार योग्य ती खबरदारी घेऊन बारावीची परीक्षेला सुरू झाली आहे.यंदा शाळेतच परीक्षा केंद्र आहे मात्र परिक्षा केंद्रापासुन दुर आसलेल्या ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागत आसल्याने एस टी बंदचा फटका विद्यार्थांना बसला आसल्याने अनेक विद्यार्थीनी खाजगी वहानाने आपले परिक्षा केंद्र गाठले असुन बहुतेक शहरातील तसेच लगतच्या परिक्षा केंद्राबाहेर मात्र कॉफी पुरवणाराची गर्दीच नसल्याने परिक्षा केंद्रावर शांततेचे वातावरण पाहायला मिळाले.
0 Comments