*सुरेश आबा पालवे पाटील यांच्यामुळे माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांना आले सोन्याचे दिवस*
*नीरा उजवा कालवा राहणार 30 जून पर्यंत चालू. ऐन उन्हाळ्यात शेतकऱ्यांना मोठा दिलासा.*
सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य व नीरा उजवा कालवा समिती सदस्य सुरेश आबा पालवे पाटील यांच्या प्रयत्नामुळे माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांना ऐन उन्हाळ्यामध्ये मोठा दिलासा मिळाला आहे पिकाला वेळेवर पाणी मिळाल्यामुळे माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळ्या प्रकारचा आनंद व्यक्त होत असताना दिसत आहे. सुरेश आबा पालवे - पाटील यांनी नीरा उजवा कालवा विभाग फलटण यांच्याकडे माळशिरस तालुक्यातील सर्व गावांना वेळेवर पाणी मिळावे यासाठी वारंवार पाठपुरावा केला होता. त्यानुषंगाने माळशिरस तालुक्यातील सर्व लहान-मोठ्या कॅनॉल ला कमीत कमी दहा दिवस अगोदर पाणी आले. आता पासून सलग ३० जून पर्यंत कॅनॉल चालू ठेवण्यासाठी आबांनी मागणी केली होती. आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. अजित दादा पवार यांनी कालवा सल्लागार समिती मीटिंग व्हीआयपी पुणे येथे मागणी मान्यही झाली.
अतिशय महत्वाच्या वेळी पाणी मिळाल्यामुळे माळशिरस तालुक्यातील शेतकरी खूप आनंद व्यक्त करत आहेत. कालवा सल्लागार समिती सदस्य सुरेश आबा पालावे - पाटील यांच्या पाठपुराव्याला यश आले असून नीरा उजवा कालवा 30 जून पर्यंत चालू राहणार आहे.
ऐन उन्हाळ्यात माळशिरस तालुका हिरवागार दिसणार आहे.
आबांची नीरा उजवा कालवा समिती सदस्यपदी निवड झाल्यापासून एकही दिवस सुट्टी न घेता माळशिरस तालुक्यामध्ये सतत कार्य चालू आहे. कर्तुत्व हे दिसत नसते ते सिद्ध करावे लागते हे आबांच्या कार्यातून दिसून येते. माळशिरस तालुक्यामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून विविध विकास कामांची साठी सुरेश आबा पालवे - पाटील यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे तसेच अजून ते सर्व प्रकारच्या विविध कामांसाठी निधी कसा उपलब्ध करता येईल हे सतत प्रयत्न करत आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून माळशिरस तालुक्यातील रस्त्याची अतिशय बिकट अवस्था असताना पालवे आबांनी खूप कमी वेळात भरगच्च असा निधी माळशिरस तालुक्याला उपलब्ध करून दिला आहे. अशी माहिती राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अशोकदादा देशमुख यांनी दिली आहे.
0 Comments