Advertisement

गावातील छोटे व्यवसायिक व फेरीवाले यांनि ग्रामपंचायतला दिलेल्या तक्रारीमुळे गुजरी (सात) हराशी वादग्रस्त हराशी रद्द.....

गावातील छोटे व्यवसायिक व फेरीवाले यांनि ग्रामपंचायतला दिलेल्या तक्रारीमुळे गुजरी (सात) हराशी वादग्रस्त

 हराशी रद्द.....
गजानन सोनटक्के जळगाव जा

 सूनगाव ग्रामपंचायत कडून दर वर्षी बाजार व गुजरी हराशी   केल्या जाते सात हराशी ही नियमाला अनुसरून केल्या जात नाही व ठेकेदार अव्वाच्या सव्वा कर  वसुली करतो  व कर वसुलीची पावती देत नाही व  सात ठरवून दिलेल्या क्षेत्रातच दुकाने असणाऱ्यांना कर पडावा व त्या व्यतिरिक्त गावातील काही मोजक्याच फेरीवाले व रेगडीवर छोटे व्यवसाय करणाऱ्यांना संबंधित ठेकेदार हा कराची सक्ती करतो परंतु जर सर्वांना कर पडत असेल तर गावातील दही दूध भाजीपाला डोक्यावर विकणार्‍यांना व गावातील RO प्लांट वाले गावात पाणी विकतात व गावातील ट्रॅक्टर वाहने बाहेरून मालआणतात त्यांना का कर पडत नाही व छोट्या व्यावसायिकांना कर पडतो असा भेदभाव का केला जातो व सर्वांना जर कर पडत असेल तर आम्ही कर देण्यास तयार आहे नियम सर्वांनाच लागू पडतो मग आमच्यासाठी का असा भेदभाव ग्रामपंचायत मध्ये होतो व संबंधित ठेकेदार याला यापुढे आम्ही कर देणार नाही व होणाऱ्या वादास ग्रामपंचायत जबाबदार राहणार अशा स्वरूपाची तक्रार सुनगाव येथील छोटे व्यवसायिक व फेरीवाले यांनी ग्रामपंचायतला 10 / 3 20 22 रोजी तक्रार  केली होती त्त्यानुसार काल दिनांक 26 मार्च रोजी जाहीर रित्या हराशी ठरली होती परंतु या लिलावात तीन ते चार ठेकेदार यांनी भाग घेतला होता परंतु गावातील छोटे व्यावसायिक फेरीवाले यांनी केलेल्या ग्रामपंचायतला केलेल्या तक्रारीवर कुठलाच निर्णय न झाल्या मुळे या तक्रारकर्त्यांनी या लिलावात ठणकावून सांगितले की आम्ही यापुढे कर देणार नाही व या होणाऱ्या वादास ग्रामपंचायत जबाबदार राहील त्यामुळे हा लिलाव वादग्रस्त ठरून ही हराशी रद्द झाली त्यामुळे ही हराशी वादग्रस्त ठरली आहे व सुनगाव ग्रामपंचायत कडून 40 ते 50 हजारात सात गुजरी ही ठेकेदाराला विकून टाकल्या जाते परंतु ही हराशी पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद स्तरावर नसून ती स्थानिक ग्रामपंचायत अंतर्गत येते परंतु या कराचा भुर्दंड हा सुनगाव वासियांना भोगावा लागत आहे त्यामुळे नाहक त्रास हा सूनगावकरांना होत आहे तरी सरपंच व ग्रामपंचायत यांनी सुनगाव नागरिकांच्या हितासाठी योग्य निर्णय घेऊन ही हराशी कायम स्वरूपी रद्द करावि व नागरिकांना घर बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्यासाठी सुद्धा लागणारा कर सुद्धा रद्द कारावा व नागरिकांच्या हिताचा चांगला निर्णय घ्यावा अशी मागणी होत आहे यावर ग्रामपंचायत काय निर्णय घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

Post a Comment

0 Comments