सोयगांव तालुक्यातील रवळा ते जामठी रस्त्याची दुरावस्था वाहनचालकांना करावी लागते कसरत जि. प बांधकाम विभागाचे दुर्लक्ष तात्काळ काम चालू करा संभाजी पवार यांची मागणी
सोयगाव औरंगाबाद प्रतिनिधी सुनील चव्हाण
सोयगांव तालुक्यातील रवळा येथील रवळा ते जामठी या रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस खराब होत चालली असुन, राजकीय नेते व संबंधित विभागाकडून दुर्लक्ष झाल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले असुन, पावसाळ्या पुर्वीच रसत्याची दुरुस्ती करून डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी संभाजी पवार (सामाजिक कार्यकर्ते)रवळा ता सोयगाव यांनी केली आहे.हाच रस्ता पुढे रवळा, जवळा,जामठी, तोंडापूर,फर्दापूर व सोयगाव जाण्यासाठी हा रस्ता एकमेव पर्याय आहे. रस्त्याने रवळा ते जामठी कडे जाणाऱ्या चार किलोमीटर रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली असून रस्ता शेवटचा श्र्वास घेत आहे. ठीकठिकाणी अर्ध्या फुटांपर्यंत जागोजागी खड्डे पडले आहेत. मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्यांमध्ये पाणी साचले होते. अनेक ठिकाणी खड़ी बाहेर उघडी पडली. यामुळे वाहन चालकांना जीव मुठीत धरून वाहन चालावे लागत आहे. विशेष म्हणजे या रस्त्यावर सोयगाव व औरंगाबाद येथे रोजच ग्रामस्थांना विविध कामासाठी जावे लागते आणि या रस्त्यावरून फर्दापूर, सोयगाव येथे शाळा,काँलेज व शासकीय कामे असल्याने मोठी रहदारी सुरुच असते,नेतेमंडळी रवळा गावात फक्त निवडणूकी पुरतेच येतात नंतर पाच वर्षे या ग्रामीण भागातील गावाकडे फिरकत सुद्धा नाही.
"अतिवृष्टीमुळे सततच्या पावसामुळे या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने पाणी साचले होते. पाऊस उघडल्या नंतर या रस्त्याचे काम होईल असे परिसरातील वाहनधारक व नागरिकांना यावर्षी रस्त्याचे काम होईल अशी अपेक्षा होती.मात्र पत्रकारांच्या बातम्यांना सार्वजनिक बांधकाम खाते केराची टोपली समजतात असे चित्र दिसून येत आहे. संबंधित विभाग, नेते व पुढाऱ्याचे दुर्लक्ष रवळा ते जामठी या रस्त्याबाबत विविध पक्षांच्या राजकीय नेते मंडळी तसेच संबंधीत विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. सद्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लांबवणीवर गेल्याने पुढाऱ्याचे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाल्याचे नागरिकांकडून चर्चा होत आहे".असे सावळदबाराचे उपसरपंच
मो.आरिफ मो.लुखमान यांनी "साप्ताहिक आपले ज्ञानपंखचे वृत्तपत्राचे प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत यांच्याशी बोलताना सांगितले.
""हाच रस्ता पुढे या मार्गाने तोंडापूर फर्दापूर ते औरंगाबाद - जळगाव रस्त्यावर जुळतो म्हणून रहदारी मोठ्या प्रमाणात सुरु असते. रसत्यावर खड्डेच खड्डे झाल्याने वाहन धारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. वाहनधारकासह नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.त्यासाठी रवळा ते जामठी या रस्ताचे काम तात्काळ चालू करावे अन्यथा आंदोलन करण्यात येईल अशा इशाराच सामाजिक कार्यकर्ते संभाजी पवार व नागरिकांनी यांनी दिला आहे.
0 Comments