Advertisement

रानडुकरांची तस्करी करणाऱ्या दोघांना अटकजामोद वनविभाची कारवाई

रानडुकरांची तस्करी करणाऱ्या दोघांना अटकजामोद वनविभाची कारवाई
बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तसेच संग्रामपूर परिसरात सातपुड्याच्या पायथ्याशी जंगली प्राण्यांची दररोज शिकार केल्या जाते आणि हे जनावरांचे मास सरांस बाजारात किंवा हॉटेल आणि धाब्यावर सर्रास विकल्या जात आहे.परंतु आजपर्यंत या अवैध तस्करीवर जळगाव वनविभाग यांचे अभय असल्याने यांच्यावर आजपर्यंत कारवाई होऊ शकली नाही. परंतु नव्याने आलेले जामोद विभागाचे वनपाल आर. के. तायडे यांनी आपल्या वनविभागाच्या खाकी वर्दीचा धाक दाखवून जामोद सर्कलमध्ये कारवाईस सुरुवात केली आहे.संग्रामपूर तालुक्यातील जुनी वसाडी येथे २४ मार्च रोजी शिवाजीनगर येथे दोन आरोपींनी अज्ञात शेतामध्ये बॉम्बगोळा टाकून रानडुकराचे शिकार करण्यात आले नंतर त्या रानडुकराचे मास विक्रीसाठी नेले असता त्या ठिकाणी संबंधित वनरक्षक वनपाल तायडे यांना सूत्रांकडून माहिती मिळताच ते आपल्या सहकाऱ्यांसह विक्रेत्यांकडेपोहोचले आणि वन्यजीव प्राणी, रानडुक्करचे मांस अंदाजे २० किलो विकताना घटनास्थळा वरून ताब्यात घेतले. या कारवाईमध्ये वनपाल तायडे सह, एस एस बुधवत, एस ए साळवे वनरक्षक यांनी आरोपींना अटक करून मास जप्त केले. सदर आरोपीस न्यायालयात हजर केले असता त्यांना २७ मार्चपर्यंत वन विभागाची कस्टडी मिळाली

Post a Comment

0 Comments