मंडल विरुध्द कमंडल ची भाषा असणारा भाजपाच ओबीसींचा खरा शत्रू-समाधान दामधर

मा. राहुलजी गांधी यांनी दोन चोरांना चोर म्हटले म्हणून ओबीसी समाजाचा अपमान होत नाही, फक्त मोदी म्हणजेच ओबीसी आहे असं नाही. देशांमध्ये करोडो लोक जे शेतकरी आहेत, कामगार आहेत, व्यावसायिक आहेत अशा सर्व सामान्य कुटुंबातून करोडो लोक जे देशाच्या जडणघडणीत हातभार लावतात ते ओबीसी वर्गामध्ये आहेत. ओबीसी समाज हा कष्टकरी समाज असुन नेहमीच देश हितासाठी धावून येणारा आहे.ओबीसी समाजा तील दोन लोकांनी देशातील बँका बुडवून पळून जाणे हा खऱ्या अर्थाने ओबीसी
समाजाचा अपमान आहे. देशाला चुना लावून पळून जाणाऱ्या निरव मोदीचा ओबीसी समाजाच्या वतीने आम्ही जाहीर धिक्कार करतो. राहुलजी गांधी यांनी उद्योगपती अदाणी यांच्या व्यवसायात वीस हजार कोटी रुपये कोणाचे आहेत? याचे उत्तर मोदी यांना देता आले नाही .तसेच देशाचे पैसे घेऊन पळालेल्या मोदींबद्दल चोर असे विधान केले होते परंतू भाजपचा खरा मुखवटा जनतेसमोर येऊ नये म्हणून त्यांनी ओबीसी समाजाचा आधार घेत देशांमध्ये ओबीसी समाजाचा अपमान झाला म्हणून महाराष्ट्र मध्ये राहुल गांधी यांच्या विरोधात जे आंदोलन पुकारले आहे ते चुकीचे असून हे लज्जास्पद व निंदणीय आहे. मंडल विरुध्द कमंडल ची भाषा असणारा भाजपाच ओबीसींचा खरा शत्रू आहे.राहुल गांधी यांनी संसदेमध्ये भाजप विरोधात आक्रमक भूमिका घेतल्यामुळे त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न भाजप कडून होत आहे हा प्रकार लोकशाहीसाठी घातक असून भारतासारख्या लोकशाही प्रधान देशामधील अत्यंत काळा दिवस म्हणून नोंदवला गेला आहे. आजपर्यंत ओबीसींच्या हितासाठी आणि आरक्षणासाठी कॉग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे आणि ओबीसींची बाजू मांडण्याचा प्रयत्न करत आहे आणि हे आंदोलन अजून तीव्र होऊ नये यासाठी भाजपने हे षडयंत्र रचले आहे परंतु ओबीसी भाजपच्या भूलथापांना बळी पडणार नाही, त्यामुळे भाजपने जे बेगडी आंदोलन चालू केले आहे ते त्वरित थांबवावे अन्यथा ओबीसी कॉंग्रेसकडून संपूर्ण देशभर आंदोलन छेडण्यात येईल असा माहिती प्रेस नोट व्दारे समाधान दामधर बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग
जिल्हा कार्याध्यक्ष यांनी दिली आहे.
0 Comments