
काँग्रेसच्या पाठपुराव्यामुळे जळगाव जामोद तालुक्यातील 27000 शेतकरयांना मिळणार सतत च्या पावसाची मदत - तहसीलदार यांचे लेखी पत्र*
प्रतिनिधी नागेश भटकर
जळगाव जामोद तालुक्यात २०२२-२३ मध्ये झालेल्या सततच्या
पावसामुळे तालुक्यातील शेत पिकांचे अतोनात नुकसान झालेले होते. या बाबत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या ओबीसी विभाग कडून वारंवार निवेदन व आंदोलन करण्यात आले होते. २० जुन २०२३ ला झालेल्या आंदोलनात जिल्हा कार्याध्यक्ष समाधान दामधर यांनी सतत च्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्याबाबत व मदतीबाबत निर्वाणीचा इशारा दिला होता.
सदर आंदोलनाची दखल घेऊन जळगांव जामोद तहसीलदार यांनी पिक नुकसानीचे पंचनामे बाबतचा अहवाल
शासनाला सादर केलेला असून यामध्ये जळगांव जामोद तालुक्यातील २७,००० शेतकऱ्यांचा समावेश आहे व सदर अहवालातील शेतकरी यादी तलाठींकडून गोळा करून लवकरच प्रसिद्ध करु तरी आपण आपले आंदोलन स्थगित करण्याची विनांती लेखी पत्राद्वारे केली आहे.
पेरणीच्या वेळेस मदत मिळणार म्हणून शेतकऱ्यानी आनंद व्यक्त केला व समाधान दामधर यांच्या नेतृत्वात काँग्रेसने केलेल्या पाठपुरावाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
0 Comments