Advertisement

मायाताई धांडे ह्या जिजाऊ भूषण पुरस्काराने सन्मानित

प्रतिनिधी : नागेश भटकर
जळगाव जामोद: विनोबा भावे यांची भूदान चळवळ कार्यकर्त्या म्हणून उत्कृष्ट कार्य व आदिवासी लोकांमध्ये सतत सामाजिक प्रबोधनाचे कार्य करणाऱ्या मायाताई दशरथ धांडे यांना *माँ जिजाऊ भूषण पुरस्कार* प्रदान करण्यात आला. माँ जिजाऊ प्रतिष्ठान तथा निर्माण मंच सिंदखेडराजा यांच्या वतीने दि. 25 जुलै 2023 रोजी सिंदखेड राजा येथे शाही कार्यक्रमात पुरस्कार देण्यात आला. रु 5000  रोख, मानचिन्ह व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. मायाताई गेल्या 30 वर्षापासून आदिवासी भागात काम करतात. मायाताई व गिरी गुरुजी यांच्या पुढाकारानेच तालुक्यातील चारठाणा हे आदिवासी बहुलगाव आदर्श गाव म्हणून जाहीर झाले होते. पाणलोट क्षेत्र कामे,नशाबंदी, नसबंदी, चराईबंदी व  जुगारबंदी अशी पंचसूत्री योजना त्यांनी आदिवासी भागात राबविलेली आहे. अजूनही त्या आदिवासींमध्ये दारूबंदीसाठी प्रबोधनाचे सतत कार्य करीत असतात. त्यांचे आदिवासी भागातील सदर कामाची दखल घेत त्यांना पुरस्कार देण्यात आला. त्यामुळे शहरात व परिसरात त्यांचे सर्वत्र कौतुक होत असुन त्यांचेवर  अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments