प्रतिनिधी नागेश भटकर
२२ जुलै रोजी झालेल्या अतीमुसळधर पाऊसा मुळे जळगांव जामोद व संग्रामपूर तालुक्यातील जनजीवन विस्कळित झाले होते. घरांचे व शेती चे अतोनात नुकसान झालेले आहे. अनेकांचा संसार उघड्यावर आलेला आहे, घरातील सर्व साहित्य पुराच्या पाण्यात वाहुन गेले व डोक्यावर छत पण नाही अशी बिकट परिस्थिती आहे.
अश्या वेळी शासकीय मदतीची वाट न पाहता जामोद येथील बाधीत आदिवासी कुटुंबांसाठी राहण्याची व जेवनाची व्यवस्था करून समाधान दामधर यांनी आदर्श निर्माण केला. या कॅम्प मध्ये ४०० लोकांच्या जेवणाची व राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सदर उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे
0 Comments