*शेतमजुराचा मुलगा शुभम दिनबंधू भगत स्पर्धा परीक्षा उतीर्ण होऊन पी.एस.आय झाला..*
जळगाव जा.प्रतिनिधी... नागेश भटकर

गुणवत्ता ही आता कोणाची मक्तेदारी नाही,त्यासाठी कठोर मेहनत घ्यावी लागते. कष्ट करण्याची तयारी त्यागाची भावना आणि जिद्दीने अभ्यास करण्याची तयारी यामुळेच आज सर्वच क्षेत्रात गोर गरिबांची मुल आघाडीवर आहेत, ते शिक्षणातील गुणवत्ता सिद्ध करून दाखवीत आहेत. मुक्काम पोस्ट वडशिंगी तालुका जळगांव (जामोद) जिल्हा बुलढाणा येथी एका शेतमजूर कुटुंबातील शेतमजुराचा मुलगा शुभम दिनबंधू भगत हा महाराष्ट्र पब्लिक सर्विस कमिशनच्या स्पर्धा परीक्षेत पास होऊन पी एस आय झाला.त्याने वडसिंगी गावाला जळगाव जामोद तालुक्याला मानाचा तुरा लावला त्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होऊन अभिनंदन होत आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ही महाराष्ट्र शासनच्या अखत्यारीतल्या वेगवेगळ्या सेवांसाठी आणि पदांसाठी स्पर्धा परीक्षा घेऊन उमेदवारांची निवड करणारी घटनात्मक संस्था आहे. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ३१५ अन्वये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली आहे.अर्जदारांच्या गुणवत्तेनुसार आणि आरक्षणाच्या नियमांनुसार या निवडी होतात.निवडलेल्या उमेदवारांमधून उपजिल्हाधिकारी पोलीस उपअधीक्षक, तहसीलदार,नायब-तहसीलदार,गट-विकास अधिकारी,मुख्याधिकारी इत्यादी वर्ग-१, वर्ग-२ आणि वर्ग-३ ची पदे भरली जातात.MPSC चे मुख्य कार्यालय महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई येथे आहे. महाराष्ट्र सरकारचे कामकाज सुरळीत आणि कार्यक्षमतेने होण्यासाठी हा आयोग विविध सरकारी पदांसाठी योग्य उमेदवार उपलब्ध करून देतो.त्यांच्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात.या स्पर्धा परीक्षेत गोर गरिबांचे मुलमुली पोचत नाही.शुभम दिनबंधू भगत सारखा हजारोतून एकादाच असतो तो सर्व परिस्थितीवर मात्र करून कष्ट,त्याग करून जिद्धीने अभ्यास करून यशस्वी होते.ग्रामीण भागातील एका शेतमजुरांचा मुलगा विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन शंभर टक्के यशस्वी होतो.हे शुभम भगत याने दाखवून दिले.आणि वडशिंगी गांवाचे नांव महाराष्ट्र राज्यात प्रेरणादायी व लक्षवेधी ठरविले.*.
0 Comments