
*पुलाचे बांधकाम रखडल्याने भेंडवळ येथील विद्यार्थ्यांना शाळेत जाताना करावी लागते तारेवरची कसरत...*
जळगांव जा.प्रतिनिधी:-
जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ ते चांगेफळ पर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण तसेच पुलांच्या बांधकामाचे काम गेल्या दोन वर्षापासून सुरू असून अद्याप ही पूर्ण झाले नाही. त्यामुळे भेंडवळ, इलोरा, काजेगाव,मराखेड येथील नागरिक व विद्यार्थ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. भेंडवळ पासून एक किलोमीटर अंतरावरील पुलाचे व रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षापासून चालू आहे चालू आहे. ऐन पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पाऊस सुरू असताना पुला जवळून काढण्यात आलेल्या रस्त्यावर मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये पाणी साचले असून रस्त्याची पूर्णतः चाळण झाली आहे त्या रस्त्यांवरून चालताना शाळेचे विद्यार्थी तसेच नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत असून चिखलमय रस्त्याने जाता येताना मोटरसायकल स्लिप होऊन नागरिक पडत असून पायी जाणाऱ्या विद्यार्थीनाही सुद्धा मोठा त्रास या रस्त्यांमुळे सहन करावा लागत आहे.या चिखलमय रस्त्यामुळे रात्रीच्या वेळेस मोठी जीवित हानी पण होऊ शकते. काही महिन्यापूर्वीच या ठिकाणी अर्धवट पुलाचे बांधकाम चालू असताना मोठा अपघात झाला असून यामध्ये नागरिकाला आपला जीव गमावा लागला तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येत नसून हा रस्ता काही केल्या पूर्णत्वास येत नाही. सदर रस्त्याच्या बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराने दोन वर्षापासून दिरंगाई करत हा रस्ता रखडविला असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी मुंग गिळून गप्प का असा प्रश्न येथील सर्वसामान्य नागरिकांना पडला असून सार्वजनिक बांधकाम विभागाने अपूर्ण राहिलेल्या भेंडवळ ते चांगेफळ या रस्त्याचे काम व अपुर्ण पुलांचे बांधकाम तात्काळ ठेकेदाराला सुरू करण्याचे आदेश देण्यात यावे अशी मागणी येथील नागरिकांनी अहिल्या न्यूज 24 द्वारे बांधकाम विभागाला केली आहे..*
0 Comments