Advertisement

पळशी वैद्य, पळशी घाट गावाचे पुनर्वसन करण्यासाठी संपूर्ण गावासह गुरे ढोरे बसले उपोषणाला

प्रतिनिधी नागेश भटकर
जळगांव जामोद -बुलडाणा जिल्ह्यातील जळगांव जामोद तालुक्यामध्ये जिगांव प्रकल्प पुर्णा नदिवर पुर्णत्वास येत आहे या धरणाच्या बॅक  वाटरच्या खुणा ह्या पळशी वैद्य, पळशी घाट या गावाला लागूनच असल्याने शासनाने या गावाला धरणग्रस्त यादितुन वगळले आहे दिनांक 22जुलै 2023रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण जळगांव जामोद तालुक्यासह हे दोन्ही गावे या महापुराच्या झपाट्यात आल्याने संपूर्ण गावातील घरांमध्ये 4फुट ते 5फुट पुराचे पाणी घुसले होते त्यामुळे गावातील नागरिक, गुरेढोरे यासह सर्व नागरिक भयभित झाले होते शासनाला वेळोवेळी निवेदने देऊन या दोन्ही गावांना धरणग्रस्त घोषित करुन सुरक्षित स्थळी पुनर्वसन करण्यासाठी मागणी करण्यात आली परंतु शासन, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने आज दिनांक 14 ऑगस्ट 2023रोजी लहान बाळापासुन तर वयोवृद्ध नागरिकांपर्यंत आपले गुरेढोरे सुध्दा ग्रामपंचायत कार्यालय पळशी वैद्य येथिल कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत या उपोषणाला गावचे प्रथम नागरिक सौ पुणम रविंद्र जाधव,विजय पोहनकर, रामेश्वर काळे, सह गावातील सर्व जाती धर्माचे लोक उपस्थित होते त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडीचे माजी तालुकाध्यक्ष रतनभाऊ नाईक,तालुका उपाध्यक्ष सुनिल बोदडे,तालुका महासचिव प्रा.विजय सातव, जेष्ठ नेते गुलाबराव आठवले, अमोल तायडे यांनी या उपोषणाला जाहिर पाठिंबा घोषित केला त्याचप्रमाणे  शिवसेना तालुकाप्रमुख अजय पारस्कार, भाजपाचे बंडु पाटिल, शिवसेना उबाठाचे विजय काळे सह शेकडो गावकरि सहभागी झाले होते.

Post a Comment

0 Comments