Advertisement

बालविवाह मुक्त भारत अभियान अंतर्गत मलकापूर तालुक्यातील हरसोडा,विवरा, उमाळी, माकनेर,म्हैसवाडी, लासुरा येथे बाल विवाह मुक्त अभियान राबवण्यात आले.

बालविवाह मुक्त भारत अभियान अंतर्गत मलकापूर तालुक्यातील हरसोडा,विवरा, उमाळी, माकनेर,म्हैसवाडी, लासुरा येथे बाल विवाह मुक्त अभियान राबवण्यात आले.
मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे 

आज दिनांक 19 ऑक्टोबर रोजी कैलास सत्यार्थी चिल्ड्रन फाउंडेशन दिल्ली यु एस व अस्मिता इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट यांच्या संयोगाने गावातील शाळा व महिलांनी बालविवाह विरोधी दिवस साजरा करण्यात आला. हा दिवस संपूर्ण भारतामध्ये 313 जिल्ह्यांमध्ये 16 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर बालविवाह विरोधी पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे .त्या अनुषंगाने आपल्या बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा बालविवाह विरोधी दिवस साजरा करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचा उद्देश बालविवाह नष्ट करणे. बाल विवाहाचे प्रमाण कमी करणे. "बचपन बचाओ" आंदोलनांतर्गत व "बालविवाह मुक्त भारत "या अभियानांतर्गत बालविवाहाचे प्रमाण कमी करून महिलांच्या आरोग्याच्या समस्या, माता मृत्यू, बालमृत्यू कमी करणे त्याचबरोबर मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे त्यांचं सक्षमीकरण करणे इत्यादी उद्देश या कार्यक्रमाचा आहे. बालकांविषयी विविध समस्या विषयी जसे बालविवाह, बाल तस्करी बाल यौन शोषन या बाबत उपस्थित विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.बालविवाह विरोधी शपथ घेण्यात आली.या कार्यक्रमाला गावातील सरपंच,शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका,सामाजिक कार्यकर्ते यांचे चांगले सहकार्य मिळत आहे

Post a Comment

0 Comments