Advertisement

वंचित चे 'प्रशासन जागर' आंदोलन पूरग्रस्त शेतकरी नागरिकांना दिवाळी आधी मदत मिळावी

वंचित चे 'प्रशासन जागर' आंदोलन पूरग्रस्त शेतकरी नागरिकांना दिवाळी आधी मदत मिळावी 
प्रतिनिधी नागेश भटकर
जळगाव (जा) :- वंचित बहुजन आघाडी जळगांव जामोद च्या वतीने पूरग्रस्त शेतकरी नागरिकांना दिवाळी आधी मदत मिळावी या करीत प्रशासन जागर आंदोलन उपविभागीय अधिकारी कार्यालया समोर करण्यात आले. २२ जुलै रोजी सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी झालेल्या ढगफुटीमुळे जळगांव जामोद तालुक्यातील प्रत्येक नदी नाल्याला प्रचंड महापूर आला होता या महापुरात हजारो हेक्टर शेती खरडून गेली, पिके वाहून गेली गुरे ढोरे मृत्युमुखी पडले अनेक नागरिक बेघर होऊन संसार उघड्यावर पडले आहे, अश्या परिस्थीतीत शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली आहे परंतु महापूर येऊन आज शंभर दिवस होऊन सुद्धा शासनाकडून एक रूपयाची सुद्धा मदत मिळालेली नाही जळगांव जामोद मतदार संघाचे आमदार संजय कुटे यांनी दिवाळी आधी पूरग्रस्त शेतकरी नागरिकांना मदत देण्याचे आश्वासन सुद्धा दिले होते परंतु प्रशासन स्थरावर कोणत्याही प्रकारची हालचाल व गंभीर्यात दिसून येत नाही म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने झोपलेल्या लोकप्रतिनिधींला व प्रशासनाला जागे करण्यासाठी त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी 'प्रशासन जागर डफडे बाजावो' एक दिवसीय धरणे आंदोलन शेतकऱ्यांच्या विविध मागन्यांसाठी केले या आंदोलनामध्ये, खरडून गेलेल्या जमिनीची व पीक नुकसानीची तात्काळ भरपाई शेतकऱ्यांना द्यावी. 
खरडून गेलेल्या शेतातील पिकांचा शंभर टक्के पिक विमा देण्यात यावा, शेती उपयोगी साहित्य पुरामध्ये ज्या शेतकऱ्यांचे वाहून गेले अशा नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना प्राधान्याने शासनाच्या योजनेचा लाभ द्यावा, पुरामुळे बेघर झालेल्या नागरिकांना विना निकष घरकुल मंजूर करून द्या, पुरामुळे ज्यांची शेती पूर्णतः खरडून गेली असेल अशा शेतकऱ्यांना विज बिल माफ करण्यात यावे.
, पुरामुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरी खचल्या असतील अशा शेतकऱ्यांना तात्काळ नव्याने विहिरी मंजूर करून द्या, खरडून गेलेली शेती पेरणीयोग्य करून देण्यात यावी, यलो मोझँक रोगाचे सर्वे करून आर्थिक मदत द्या, अतिक्रमण मध्ये असलेल्या टपरीधारक व्यवसायांना तात्काळ द्या या मागन्यांसाठी आंदोलन करण्यात आले. त्यावेळी आंदोलनात मा.ता.अध्यक्ष रतन नाईक, ता.उपाध्यक्ष सुनिल बोदडे, युवा नेते प्रकाश भिसे, शहर अध्यक्ष आझम कुरेशी, महासचिव विजय सातव, जि. उपाध्यक्ष, पर्वताबाई इंगळे, शंकरराव इंगळे,विजय पोहनकर,संचालक प्रशांत अवसरमोल, ता.उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कोकाटे, संतोष तिजारे,अनिलभाऊ भोपळे,शरिफ ईसामोद्दिन देशमुख, प्रदिप मोरखडे ,सोपान वाघोदे, जगदेव वाघोदे, नामदेव भगत,सुधाकर घटे, हरिदास वाघमारे, कदीर मौलाना, संतोष पवार, कैलास भगत भास्कर भगत, अनिल भोपडे मंगेश जमाव, मनोज अंदूरकर, आनंद गवई, अर्चना लुलेकर,, इ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments