Advertisement

जळगाव जामोद सारख्या विजयाची पताका सदैव फडकत राहो- मा.आ. राहुलभाऊ बोंद्रे जिल्हाध्यक्ष काँग्रेस, बुलढाणा

जळगाव जामोद सारख्या विजयाची पताका सदैव फडकत राहो- मा.आ. राहुलभाऊ बोंद्रे जिल्हाध्यक्ष काँग्रेस, बुलढाणा
प्रतिनिधी जळगाव जामोद 
  लोकांचा विचार म्हणजे काँग्रेस, लोकांची चळवळ म्हणजे काँग्रेस -डॉ.सौ.स्वाती संदीप वाकेकर.
   दि. 26 नोव्हेंबर 2023 रोजी श्री संत रुपलाल महाराज भवन जळगाव जामोद येथे पक्षनेत्या डॉ. स्वाती  वाकेकर यांच्या नेतृत्वात व तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने दिपावली स्नेहमिलन तथा कार्यकर्ता संवाद व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
   कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.आ.राहुलभाऊ बोंद्रे (जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी) हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून सातपुडा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.आ.कृष्णराव इंगळे, पक्षनेता तथा सचिव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी डॉ.सौ.स्वातीताई वाकेकर, माजी जि.प.अध्यक्ष तथा जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष प्रकाशभाऊ पाटील, माजी जि.प. सदस्य एड. सौ.ज्योतीताई ढोकणे डॉ.एस.के.दलाल साहेब, श्री.अंबादासजी बाठे, किसान सेलचे मा.जि.राजूभाऊ पाटील, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अविनाश उमरकर, शहराध्यक्ष अर्जुन घोलप डॉ.प्रशांत राजपूत, सहकार सेलचे प्रदेश सचिव आसिफ इकबाल, ओ.बी.सी. जिल्हा कार्याध्यक्ष समाधान दामधर, शहर अध्यक्ष सौ.मीनाताई सातव, ज्येष्ठ नेते नारायणराव दामधर, सौ.उज्वलाताई पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
      सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांचे तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या सदस्या तर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
     संविधान दिनानिमित्त राजाभाऊ कोकाटे सर यांनी उद्देशिका वाचन केले. जामोद ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित सरपंच सौ.गंगुबाई पुंडलिक दामधर, कुवरदेव ग्रामपंचायत चे नवनिर्वाचित सरपंच जुमानसिंग मुजाल्डा, पिंपळगाव काळे ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित सरपंच शेख हारून शेख युनूस, त्याचप्रमाणे जामोद ग्रामपंचायतचे उपसरपंच बशीरखा पठाण, भेंडवळचे उपसरपंच अकील शहा, कुवरदेव ग्रामपंचायत सदस्य रमेश सत्या, जामोद ग्रामपंचायत सदस्य शिवनारायण धुरडे, शेख रफिक, मोहम्मद कुर्शीद बानो ,शेख सुमया परवीन सुलतान, सौ.पूजा केशव काळपांडे, सौ.सविता राजू ढगे, सौ .सत्यभामा संतोष चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. तसेच अविनाश उमरकर यांची आर जी.पी.आर.एस. च्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले.
   कार्यक्रमाचे अध्यक्ष राहुलभाऊ बोंद्रे यांनी आपल्या भाषणात काँग्रेस पक्ष सर्व धर्मीयांना सोबत घेऊन चालणारा पक्ष असून *दिवाली मे अली व रमजान मे राम* असा दाखला दिला.
जामोद ग्रामपंचायत विजयाची पताका अशीच सगळीकडे फडकत राहो, लोकांचा विचार म्हणजे काँग्रेस, लोकांची चळवळ म्हणजे काँग्रेस, अशी सुतोवाच डॉ.सौ.स्वातीताई वाकेकर यांनी केले. 
    त्याचप्रमाणे प्रकाशभाऊ पाटील ऍड.सौ.ज्योतीताई ढोकणे, डॉ.एस.के. दलाल, समाधान दामधर, आसिफ इकबाल, यांची येथे भाषणे झाली.
   याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष अजहर देशमुख व अब्दुल जहीर, शे.इरफान, शे. बबलू यांच्यासह नासीर खान, मुस्तफा खान, जुनेद खान, मुज्जू खान, सादिक शेख, गोपाल ताडे, निलेश घन, अमोल हिस्सल, गजानन लेडसकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी  काँग्रेस च्या विचाराने प्रेरीत होवून प्रवेश केला.
    26 नोव्हेंबर च्या आतंकवादी हल्ल्यातील शहिदांना आदरांजली अर्पण करण्यात आली व फराळ वाटपा नंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
     कार्यक्रमाचे संचालन श्रीकृष्ण केदार यांनी तर प्रास्ताविक अर्जुनभाऊ घोलप यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी काँग्रेस च्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी  मेहनत घेतली.

Post a Comment

0 Comments