प्रतिनिधी चंद्रभान झिने देऊळगाव राजा
जिल्ह्यात रविवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसाने पिकांना प्रचंड फटका बसला. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. सोमवारी सकाळी सिंदखेड राजा व देऊळगाव राजा तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे पळसखेड चक्का, व पळस खेड झल्ट या अनेक गावांत थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन नुकसानाची पाहणी भारतीय जनता पक्षाचे ओबीसी मोर्चा चे प्रदेश उपाध्यक्ष डॉ सुनील कांयदे यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी सांगितले की शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले आहे ते प्रचंड प्रमाणात आहे त्यामुळे नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी यासाठी उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री ना अजित पवार यांच्याकडे करणार असल्याचे सांगितले
पळसखेड चक्का या एका गावात शेडनेट लावलेले जवळपास १०० शेतकरी आहेत. अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेडनेटमध्ये लावलेले टोमॅटो, वांगी, मिरची आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शेडनेट उभारणीसाठी लाखो रुपयांचा खर्च येतो. राज्य, केंद्र सरकार शेडनेटला नुकसान भरपाई देत नाही. पाच- दहा हजारांचे सानुग्रह अनुदान देऊन जमणार नाही. शेतकऱ्यांना तत्काळ योग्य प्रमाणात नुकसान भरपाई देण्याची गरज आहे.
असोला येथील ग्रामकल्याण फार्मर प्रोड्युसर कंपनीचे शेडमध्ये ठेवलेले सोयाबीन सीड पावसाने भिजले. तर वादळी वाऱ्यामुळे याच गावातील अनेक घरांवरील टिनपत्रे उडाले. टिनपत्रे उडाल्याने शेतकऱ्यांच्या घरातील कापूस भिजला. किराणा सुद्धा भिजला. .
शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळीने हिरावला आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने न पुसता योग्य प्रमाणात नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्यांना पाठबळ द्यावे.तर शेड नेट धारक शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून पॅकेज जाहीर करावे अशी मागणी केली आहे
0 Comments