प्रतिनिधी जळगाव जामोद
जळगांव जा. तालुक्यात मागील दोन दिवस सतंतधार अवकाळी पावसाने पिकाचे अतोनात नुकसान केले आहे. जुलै महीन्यातील पुराने तालुक्यातील शेतीचे कधीही न भरुन येणारे नुकसान केले. तिच भरपाई अजुन मिळाली नाही तुटक्या भरपाई साठी शेतक-यांना खेटे घ्यावे लागत आहे. ई के वाय सी यंत्रणा बंद पडली आहे. तर परत सुल्तानी संकटानंतर अस्मानी संकट येवुन ठाकले. हातातोंडाशी आलेला घास परवाच्या अवकाळी पावसाने हिरावला त्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडी , जळगांव जा. च्या वतीने तहसील कार्यालयास निवेदन देण्यात आले.
निवेदन देतांना तालुकाध्यक्ष संतोष गवई , स्वप्नील गवई जि. सदस्य , देवाभाऊ दामोदर ता उपा , साहेबराव भगत ता उपा , श्रिकृष्ण गवई ता उपा , जगदीश हातेकर ता.अ. भबौमहा. प्रा. सुभाष सिरसाट सरचीटणीस , नारायण पारवे जेष्ठ नेते , अमोल तायडे , महादेव बोदडे , बाबुराव पवार सरपंच , श्रिराम भिडे इ पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.
0 Comments