Advertisement

आत्महत्याग्रस्त अभय कोल्हे कुटुंबीयांना मदतीचा हात. किराणा कीट व आर्थिक मदत देऊन केले सातवन

आत्महत्याग्रस्त अभय कोल्हे कुटुंबीयांना मदतीचा हात. किराणा कीट व आर्थिक मदत देऊन केले सातवन 
 हिवरखेड प्रतिनिधी बाळासाहेब नेरकर
अकोला मराठा गरजवंत समाजाला आरक्षण मिळावे म्हणून डाबकी रोड अकोला येथील अभय गजानन कोल्हे यांनी पुणे येथे आत्महत्या करून आपले जीवन संपवले आहे. त्यांच्या कुटुंबाला आज मराठायोद्धा समाजसेवक गजानन हरणे व समाजसेविका सौ कमलजीत कौर, केलवीन सुबी यांच्या नेतृत्वात गरजवंत सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने आत्महत्याग्रस्त परिवाराला भेट देऊन सातवन केले. तसेच तातडीची मदत म्हणून या कुटुंबाची दिवाळी साजरी व्हावी म्हणून किराणा किड्स व आर्थिक मदत करून दिलासा देण्याचा प्रयत्न केला. कोल्हे कुटुंबाचची आर्थिक परिस्थिती बेताची, वडील कोरोना मध्ये वारलेले आहेत. आई अर्चना गजानन कोल्हे मजुरी करते परंतु तिचाही अपघात झाल्यामुळे कामाला जाऊ शकत नाही. बहिण पुनम गजानन कोल्हे बारावीला आहे .आजी शांताबाई बळीराम कोल्हे 85 वर्षाची आहे. अशा या छोट्या कुटुंबाचा आधार असलेला युवक गोपाल गजानन कोल्हे यांनी आरक्षण मिळावे म्हणून पुना येथे शिक्षण घेत असताना आपली जीवन यात्रा संपवली . कुटुंबाला व आईस आशा असलेली ज्योत मालवली .त्यामुळे या कुटुंबावर मोठ्या प्रमाणात आर्थिक संकट उभे राहिले आहे .त्याला दिलासा देण्यासाठी अकोला येथील समाजसेविका कमलजीत कौर, त्यांचा मुलगा केलविन सुबी, यांनी पुढे येऊन या कुटुंबाला किराणा किड्स व काही आर्थिक मदत देऊन दिलासा दिला मदत केली. यावेळी मराठायोद्धा समाजसेवक गजानन हरणे यांच्या शुभहस्ते व प्रभागाचे नगरसेवक मनोज गायकवाड, जगदीश उर्फ अण्णा देशमुख, सकल मराठा समाजाचे पदाधिकारी नरेश सूर्यवंशी, नंदकिशोर गावंडे, शुभम रक्षक, आदी सकल गरजवंत मराठा समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते. सकल गरजवंत मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन सातवन केले. संपूर्ण समाज आपल्या पाठीशी असल्याचे सांगितले. व तरुणांना आवाहन केले की त्यांनी आत्महत्या न करता शासनाच्या या धोरणाच्या विरोधात लोकशाही व शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचे आव्हान मराठायोद्धा गजानन हरणे यांनी केले. तसेच जिल्हाधिकारी यांनी या गंभीर बाबीकडे जातीने लक्ष देऊन मयत अभय गजानन कोल्हे यांच्या कुटुंबांना शासनाने मदत करून त्यांच्या आईला वडील व मुलगा मरन पावले असल्यामुळे दारिद्र रेषेखालील रेशन कार्ड तसेच निराधार योजने अंतर्गत पगार लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी समाजसेविका कमलजीत कौर यांनी केली.शासनाने या सर्व बाबीची लवकरात लवकर दखल घेऊन कोल्हे कुटुंबाला मदत करावी अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालया समोर जनआंदोलन करण्यात येण्याचा इशारा गजानन हरणे मराठायोद्धा तथा संयोजक निर्भय बनो जनआंदोलन यांनी प्रशासनाला प्रसिद्धी पत्रकार द्वारे दिला आहे.

Post a Comment

0 Comments