कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत गोरगरीब लोकांना न्याय मिळण्याची आशा...
संग्रामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेल्या 15 दिवसांपासून सुरु असलेल्या प्रचारा दरम्यान आज संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल, टूनकी, व पातूरडा या तीन बूथ केंद्रात पोलीस बंदोबस्त्तात शांततेत निवडणूक पार पडली असून आज दि. 19 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वा पासून मतमोजणी सुरु झाली यामध्ये एकूण 18 संचालक पदासाठी लढा देणाऱ्या शेतकरी विकास पॅनल व शेतकरी महाविकास आघाडी या दोन्ही पॅनल च्या एकूण 41 उमेदवारांपैकी भाजप व शिंदे गटाच्या एकूण 12 उमेदवारांचा बहुमताने विजय झाला तर महाविकास आघाडीच्या शेतकरी महाविकास पॅनलने एकूण 6 जागेवर विजय मिळवला आहे त्यामुळे 18 पैकी 12 जागेवर बहुमत घेऊन संग्रामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनल ने आपला झेंडा फडकावीला आहे...
पार पडलेल्या या निवडणुकीत वरवट बकाल, टूनकी, पातूरडा या तिन्ही केंद्रांवर 1119 पैकी 1090 मतदारांनी आपला मतदाना चा हक्क बजाऊन एकूण 97% मतदानाचा उच्चांक गाठला असून या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनल ला कौल मिळाला आहे..
0 Comments