ई-केवायसी लिंक सुरू करा अन्यथा तहसिल कार्यालयात ठिय्या वंचित बहुजन आघाडी
जळगांव (जा):-२२जुलै रोजी झालेल्या महापूरामुळे शेतकऱ्यां शेतीचे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते व तब्बल पाच महिन्या नंतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे शासनाने जाहीर केले ११ नोव्हेंबरमध्ये रोजी नुकसानग्रस्त नागरिकांची यादी जाहीर करण्यात आली व यादी जाहीर झाल्यानंतर त्या यादीमध्ये व्ही के नंबर असतो तो व्ही के नंबर ई केवायसी करतेवेळी महत्त्वाचा असतो व ई केवायसी केल्यानंतरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई ची मदत जमा होत असते. परंतु एकच दिवस ई केवायसी लिंक शासनाकडून सुरू ठेवण्यात आली होती. त्या नंतर जवळपास आज १८ दिवस झाले ई केवायसी लिंक ची साईट बंद आहे. २२ जुलै च्या महापुराने जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे हजारो हेक्टर जमीन खरडून गेली पिके वाहून गेली घरे वाहून गेले शेती उपयोगी साहित्य वाहून गेले गुरेढोरे मृत्युमुखी पडले परंतु तब्बल पाच महिने पूर्ण होऊन सुद्धा शेतकऱ्यांना पूरग्रस्तांना नुकसान भरपाई मिळालेली नाही फक्त आश्वासन देऊन
पूरग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम हे शासन प्रशासन करत आहे. ज्या ई-केवायसी लिंकच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पूरग्रस्तांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई जमा होते ती साईट लवकरात लवकर सुरू करण्यात यावी अन्यथा दिनांक ०५/१२/२०२३ ला लोकशाही मार्गाने वंचित बहुजन आघाडी जळगांव (जा) नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सोबत घेऊन तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे यावेळी शहर अध्यक्ष आजम कुरेशी, माजी तालुका अध्यक्ष रतनभाऊ नाईक, तालुका उपाध्यक्ष सुनिलभाऊ बोदडे, युवा नेते प्रकाश भिसे, संचालक प्रशांत अवसरमोल, संतोष पवार, मनोज अंदुरकार, कैलास भगत,स्वप्निल भोरे, अमोल तायडे, महादेव खरात,सुदाम गवई, यांसह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments