प्रतिनिधी जळगाव जामोद
आज दिनांक 27 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्र सरकारने आपला अंतरिम अर्थसंकल्प मांडला, अस्मानी संकटात हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना या अर्थसंकल्पातुन खुप मोठ्या आशा होत्या परंतु या सरकारने शेतकऱ्यांच्या पाने पुसून सरकार शेतकरी विरोधी असल्याच सिद्ध केल आहे. या अर्थसंकल्पातुन फक्त मोठे मोठे आकडे फुगवून तसेच ठेकेदारांचा संकल्प केल्याचे दिसते.शेतकरी व मध्यम वर्गीय जनतेचे आजच्या अर्थसंकल्पाने घोर निराशा केली आहे. या सरकारच्या काळात शेतकरी उपाशी आणि ठेकेदार तुपाशी असे म्हणण्याची वेळ आलेली आहे.
0 Comments