जळगाव जामोद संग्रामपूर या दोन्ही तालुक्यातील हजाराचे संख्येने दिव्यांग बांधव आपल्या मागण्या घेऊन तहसीलदार यांना आक्रोसपणे निवेदन देण्यात आले. दिव्यांग बांधवांना सर्व दिव्यांग बांधवांना सरसकटपणे अंतोदय कार्ड देणे आवश्यक आहे पण बोटावर मोजण्या इतकेच दिव्यांग बांधवांना अंतोदय कार्ड देण्यात आले राहिलेले सर्व दिव्यांग बांधव या योजनेपासून वंचित आहे. त्याच पद्धतीने संजय गांधी निराधार योजनेत महाराष्ट्र वगळता बाकी राज्यांमध्ये दिव्यांग बांधवांना मोठ्या प्रमाणात मानधन मिळते पण महाराष्ट्रामध्ये तुटपुंज्य स्वरूपात म्हणजे 1500/- रुपये मिळते यात वाढ करून तीन हजार रुपये देण्यात यावे तसेच दिव्यांग बांधव मोठ्या प्रमाणात शिक्षित आहे स्वतःच्या पायावर उभे राहता यावे म्हणून शासनाकडे अपंग बीज भांडवल योजनेत, जिल्हा उद्योग केंद्र यामधून उद्योगासाठी केसेस मंजूर होतात पण बँका या ठिकाणी अपंग बांधवांना लोन देण्यास नाहक त्रास देतात त्यामुळे असा बँक मॅनेजर कायद्यात्मक कारवाई होणे गरजेचे आहे , तसेच सर्व दिव्यांग बांधवांना घरकुल योजना मिळणे आवश्यक आहे आधी मागण्यांसह माननीय तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले यावेळी तेजराव पाटील, सरदार अवासे,गणेश वसुले ,दिगंबर अविनाश ,गोविंदा वाघ, श्रीरंग बादरे, नारायण खंडारे, जगन्नाथ कोयटे ,नरसिंग चव्हाण व राहुल चंदनकर अनेक अपंग बांधव उपस्थिती होते ना दिल्यास अपंग बांधवांच्या वतीने येणाऱ्या लोकसभेवर बहिष्कार टाकण्यात येईल असा इशारा सुद्धा देण्यात आला
0 Comments