Advertisement

आदिवासी ग्राम निमखेडी येथे भूमी सुपोषण ,संरक्षण ,गो संवर्धन व आत्मनिर्भर ग्राम या अभियानाची भूमि तथा गोपूजन करून सुरुवात

आदिवासी ग्राम निमखेडी येथे भूमी सुपोषण ,संरक्षण ,गो संवर्धन व आत्मनिर्भर ग्राम या अभियानाची भूमि तथा गोपूजन करून सुरुवात

प्रतिनिधी जळगाव जा. 
  राष्ट्रीय कर्तव्य अभियान महाराष्ट्र व आंतरराष्ट्रीय पर्यावरण महासंघ द्वारा क्रांतीसुर्य बहुउद्देशीय शिक्षण संस्था खेर्डा ता जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा यांचे संयुक्त विद्यमाने भूमी सुपोषण , शेतीतून आत्मनिर्भर ग्राम वाटचाल हा उपक्रम राबविण्यात येत आहे .
   या अभियानाची सुरुवात म्हणून आज दिनांक 9 एप्रिल 2024 गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर तालुक्यातील आदिवासी ग्राम निमखेडी येथे भूमि तथा गो पूजन करून करण्यात आली .कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संत गाडगेबाबा ,बिरसा मुंडा तसेच भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .उपस्थित सर्व आदिवासी शेतकऱ्यांनी आपआपल्याल्या शेतातून आणलेल्या मुठभर मातीचे सामूहिक पूजन करण्यात आले तसेच महिला शेतकऱ्यांच्या हस्ते गोपूजन करण्यात आले .प्रसंगी शेतकऱ्यांना शेती बांधावरच कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोदचे कृषी शास्त्रज्ञ श्री उमाळे साहेब यांनी गोमाता तथा गोवंशाचे महत्व पटवून दिले तसेच सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे हे सुद्धा आपल्या मार्गदर्शनातून स्पष्ट केले त्यानंतर स्थानिक जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणातत शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. सदर ठिकाणी शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती विषयीचे महत्व अगदी सहज पटावे म्हणून विविध पोस्टर्स द्वारे जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला तसेच कार्यक्रम स्थळी उपस्थित शेतकऱ्यांना शेतकरी डायरीचे वाटप करण्यात आले सदर शेतकरी मेळाव्यामध्ये नैसर्गिक शेती कशी करायची व त्याचे भविष्यातील फायदे इत्यादी व रासायनिक खते तथा रासायनिक औषधांचे दुष्परिणाम कृषी विज्ञान केंद्राचे कृषी शास्त्रज्ञ श्री उमाळे साहेब यांनी विस्ताराने विशद केले तसेच गोमाता व गोवंशाची गरज सेंद्रिय शेतीसाठी तसेच भविष्यातील निरोगी पिढीसाठी कशी आवश्यक आहे हेआपल्या मार्गदर्शनातून उपस्थित ग्रामस्थांना पटवून दिले
कार्यक्रमाला कृषी विज्ञान केंद्राचे कृषी शास्त्रज्ञ उमाळे साहेब ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रमेश भाऊ बिबोकार ,जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक उमेश खारोडे , रसूलपूर गट ग्रामपंचायतचे उपसरपंच रविभाऊ बिबोकार ,वन समिति अध्यक्ष सुकलाल पानेकर ,ग्रामपंचायत सदस्य सुलुबाई धांडेकर व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते
उपस्थितांचे आभार संस्थेच्या वतीने श्री उमेश खारोडे यांनी मानले

Post a Comment

0 Comments