अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे मा. अध्यक्ष न्याययोध्या मा.खा.श्री.राहुलजी गांधी यांच्या वाढदिवसा निमित्त जळगांव (जा) मतदार संघातील आदीवासी ग्राम डुक्करदरी येथील मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. मा.खा.राहुलजी गांधी यांची भारत जोडो यात्रा जेव्हा महाराष्ट्रातून मध्यप्रदेश कडे रवाना झाली तेव्हा जळगाव जा हे शेवटचे ठिकाण होते. याच डूक्करदरी आदिवासी गावानजीक निमखेडी शिवारात सातपुड्याच्या पर्वत रांगेत राहुलजी यांचा दोन दिवस मुक्काम होता. जळगाव नगरीत उस्फुर्त असा यशस्वी आदिवासी मेळावा सुद्धा पार पडला होता. त्या दिवसाची सुद्धा आज आठवण झाली.
मा.खा.राहुलजी गांधी यांचा वाढदिवस केक कापून व मिठाई वाटून साजरा करण्यात आला.
यावेळी उपस्थित बांधवाना संविधानाचे महत्व समजावून उपस्थित विध्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्व पटवून देण्यात आले.
याप्रसंगी सचिव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस तथा जळगांव (जा) मतदार संघाच्या पक्षनेत्या डॉ.सौ.स्वातीताई वाकेकर, माजी जि.प.अध्यक्ष प्रकाशभाऊ पाटील, तालुकाध्यक्ष अविनाश उमरकर, मा.नगरसेवक श्रीकृष्ण केदार, अझहर देशमुख, जुनेद शेख, नासीर भाई, अनिल इंगळे, विठ्ठल डांगे, गजानन पुंडे, मनोहर मानकर, लोहार सिंग, फाट्यासिंग, रामसिंग भाई, ढगे सर, सुनिल निमकर्डे, नितीन जाधव आदी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी चिमुकल्यांना शालेय साहित्याचे वाटप करून मा.खा.राहुलजी गांधी यांच्या दीर्घायुष्य साठी प्रार्थना करण्यात आली.
0 Comments