Advertisement

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी कृषि अधिकारी यांना घेराव. येणाऱ्या 16 ऑगस्ट पर्यंत शेतकऱ्यांच्या समस्या सोडवा अन्यथा महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलनाची प्रसेनजीत पाटिल यांची घोषणा.

*शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी कृषि अधिकारी यांना घेराव.*
     *येणाऱ्या 16 ऑगस्ट पर्यंत शेतकऱ्यांच्या समस्या सोडवा अन्यथा महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलनाची प्रसेनजीत पाटिल यांची घोषणा.*
               राज्य शासनाच्या वतीने कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5 हजार अनुदानाची घोषणा करण्यात आली आहे त्यासाठी पात्र शेतकऱ्याची यादी 11/8/2024 रोजी घोषित करण्यात आली परंतु सदर अनुदान यादीत बहुतांश गावातील शेतकऱ्यांची नावे वगळण्यात आली आहेत.शेतकरी पात्र असतांना सुद्धा त्यांची नावे अनुदान यादीत आलेली नाहित. तसेच मागील वर्षीचा खरीप तथा रब्बीचा पिकविमा मंजूर असुन सुद्धा अद्याप शेतकऱ्यांना वाटप सुरु झालेले नाही. 




पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना त्रुटी दाखवून डावलल जातं आहे अश्या विविध मागण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार ) पक्षाचे नेते प्रसेनजीत पाटिल तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे सहसंपर्क प्रमुख दत्तात्रय पाटिल यांनी आज दिनांक 12/8/2024 रोजी पदाधिकारी व शेतकऱ्यांसह जळगाव जामोद कृषि अधिकारी यांना घेराव घालून वरील विविध मागण्यांसंदर्भात कृषि अधिकारी यांना जाब विचारला तसेच येणाऱ्या 16/8/2024 शुक्रवार पर्यंत वरील समस्यांचा निपटारा न झाल्यास महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलनाची हाक देण्यात आली. 16 ऑगस्ट रोजीच्या आंदोलनात तालुक्यातील सर्व शेतकरी तथा महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन दत्तात्रय पाटिल यांनी केले. यावेळी एम.डी. साबीर, प्रमोद सपकाळ, महादेव भालतडक, ईरफान खान, शेख जावेद, आशिष वायझोडे, पवन वाघ, दत्ता डिवरे, विठ्ठल घुले,व्ही.एम. गावंडे, निजाम राज, अमोल घुले, निखिल पाथ्रीकर यांच्यासह असंख्य पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments