जळगांव जामोद:- मागील वर्षी अतिवृष्टीमुळे २२जुलै २०२३रोजी जळगांव जामोद तालुक्यात महापुरामुळे शेती, घरे लहान मोठे उद्योग करणारे दुकानदार टपरीधारक यांचे प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान झाले.
नुकसानीच्या पंचनामे व मदत देण्यासाठी राज्यसरकारने तात्काळ महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना आदेश दिले.
जळगांव जामोद तालुक्यात महसूल विभागाच्या वतीने तलाठी, ग्रामसेवक व अन्य काही विभागाचे कर्मचारी यांनी नुकसानीचे पंचनामे केले.
जळगांव जामोद तालुक्यात दुकानदारांच्या मदितीच्या याद्यांमध्ये मोठा घोळ झाला असून पात्र लाभार्थ्यांना डावलून अपात्र दुकानदारांना पा दाखवून त्यांच्या बँक खात्यात लाखो रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे.
यासंदर्भात मागील १वर्षापासून नुकसानग्रस्त दुकानदार सतत प्रशासनाकडे पाठपुरावा करीत असून यामध्ये अमोल मुरलीधर दाभाडे व गणेश प्रल्हाद वानखडे यांनी जळगांव जामोद तहसीलदार व काही कर्मचारी यांनी लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे दुकानदारांच्या याद्यांमध्ये सिद्ध होते.
त्यामुळे जळगांव जामोद तहसील कार्यालय आता अतिवृष्टी अनुदानात मोठा भ्रष्टाचार झालेला आढळून येत आहे.
त्यामुळे आज अमोल दाभाडे व इतर दुकानदार यांनी यासंदर्भात उपविभागीय अधिकारी जळगांव जामोद यांना तक्रार अर्ज करून तात्काळ संबधित अधिकारी व तहसीलदार यांच्यावर गुन्हे दाखल करून सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी यावेळी केली तसेच २० ऑगस्ट २०२४ नंतर अभिनव आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
0 Comments