*बाळगोपाळांना कृष्णाच्या रूपात बघून मनुष्य दुःख हरऊन जातो*
*- डॉ.सौ.स्वातीताई संदीप वाकेकर.*
जळगाव जामोद: सातपुडा कॉन्व्हेंट ऑफ स्कॉलर्समध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सातपुडा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कृष्णरावजी इंगळे , तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. दलाल,सौ. उर्मिला ताई इंगळे,उपस्थित होते. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण सरकटे, संस्थेच्या कोषाध्यक्ष डॉ. सौ. स्वातीताई वाकेकर, संचालिका सौ.गौरीताई सातव संस्थेचे संचालक डॉ. संदीपजी वाकेकर, प्राचार्य संतोषजी बकाल, उपप्राचार्य धीरज निकडे, यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात श्रीकृष्णाच्या मूर्तीचे पूजन करून करण्यात आली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण भक्तिमय झाले. विशेषतः दहीहंडी आणि गोपाळकाला नृत्यांनी सर्व उपस्थितांची मने जिंकली.
उदघाटनीय भाषणात बोलतांना स्वातीताई यांनी बालगोपालांना कृष्णाच्या रूपात बघून मनुष्य आपलं दुःख हरवून जातो, भगवान श्रीकृष्णा कडून आपण सर्वाना सोबत घेत सर्वांच्या सुख दुःखात सहभागी झालो पाहिजे असे सांगितले. तसेच यावेळी डॉ. एस. के. दलाल सर यांनी लहान मुलांना शुभेच्छा दिल्यात.
कार्यक्रमाचे संचालन जया सुरडकर आणि रक्षा गांधी यांनी केले. विद्यार्थ्यांकडून घेण्यात आलेल्या मटकी डेकोरेशन स्पर्धा, पोस्टर मेकिंग स्पर्धा यासाठी बक्षिसे व प्रशस्तीपत्रके मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. तसेच, पालकांसाठी आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विजेत्यांना देखील बक्षिसे देण्यात आली.
कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि समर्पक पद्धतीने करण्यात आले. यामध्ये सातपुडा कॉन्व्हेंट ऑफ स्कॉलर्सच्या शिक्षकांनी आणि स्टुडंट कौन्सिलने मोलाची भूमिका बजावली.
0 Comments