Advertisement

गुणवंत विद्यार्थी व माळी समाज भूषण सत्कार समारंभ संपन्न... गुणवंतांनी समाजाचा ऋण फेडाव - डॉ.सौ स्वाती संदीप वाकेकर

गुणवंत विद्यार्थी व माळी समाज भूषण सत्कार समारंभ संपन्न...                                                                       

*गुणवंतांनी समाजाचा ऋण फेडाव*
 *- डॉ.सौ स्वाती संदीप वाकेकर*
जळगांव जा दि 4-
 जळगांव व संग्रामपुर तालुका महात्मा फुले माळी समाज मंडळातर्फे श्री.संत शिरोमणी सावता महाराज यांच्या ७२९ व्या पुण्यतिथी पर्वावर दरवर्षी प्रमाणे आयोजीत गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा व समाज भूषण सत्कार सोहळा रविवार दिनांक ४ ऑगस्ट २०२४ रोजी कृषी विज्ञान केंद्र जळगांव जामोद येथे मा.आ.कृष्णरावजी इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. 
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.हरिभाऊ इंगळे, डॉ.सौ.स्वातीताई वाकेकर, अँड.सौ.ज्योतीताई ढोकणे, मंडळाचे अध्यक्ष प्रविणभाऊ भोपळे, डॉ.शेषराव भोपळे, रामदासजी वाकेकर,  वासुदेवराव भोपळे, नितीनभाऊ सातव, राजूभाऊ आसोलकर, सुनील तायडे, गणेश भड, सारंगधार गोमासे, सुरेश वानखडे, विलास मसने सर, अशोक कलोरे उपस्थित होते. 
   यावेळी माळी समाज भूषण सन्मानीय पी.एम. घाटोळ यांचा प्रशस्तिपत्र सन्मान चिन्ह,सिल्वर मेडल देऊन सत्कार कृष्णरावजी इंगळे, सौ.उर्मिलाताई इंगळे, डॉ.सौ.स्वातीताई वाकेकर, सौ. ज्योतिताई ढोकणे तथा मान्यवर यांनी केला. 
  तर पी. एम.घाटोळ सर सत्काराला उत्तर देतांना म्हणाले की, आपण जीवनात समाज कार्य करीत रहावे समाज आपली दखल घेत असतो.
 या प्रसंगी समाजातील 5 डॉक्टरसह सर्व प्रावीण्य प्राप्त 375 गुणवंतांचा सत्कार करण्यात येवून सन्मानचिन्ह प्रशस्तिपत्र व रोख बक्षीसे देण्यात आली व सत्कार करून  समाजातील सेवानिवृत कर्मचारी बांधवाचा सत्कार करण्यात आला.
      यावेळी डॉ.सौ. स्वातीताई वाकेकर यांनी आपले विचार व्यक्त करतांना सांगितले की, समाजाची प्रगती करण्यासाठी युवक युवतीची भूमीका महत्वाची ठरते यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी शिक्षण हे वाघिणींच दूध म्हटल्या गेल ते खरच आहे ते पिल्यावर माणुस गुरगुरल्याशिवाय राहत नाही म्हणुन शिक्षण घेवुन प्रगती करा असे आवाहन केले.
   तसेच अँड.ज्योतीताई ढोकणे ह्या मार्गदर्शन करतांना म्हणाल्या की आई व वडील यांचा आदर्श समोर ठेवून जीवन जगावे, तसेच गुणवंत विद्यार्थ्यांनी उच्च गुणानुक्रमाने परिक्षा उतीर्ण केल्याबद्दल त्यांचा गुणगौरव करून भावी जीवनबद्दल शुभेच्छा दिल्या.
    तसेच मा.आ.कृष्णरावजी इंगळे यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की जीवनात अशक्य काहीच नाही, भावी उज्वल जिवन जगत असताना स्पर्धेत आपण टिकण्यासाठी प्रयत्न करावे, तसेच विविध उद्योग करून समाजाची व आपली प्रगती साधावी यासाठी शुभेच्छा दिल्या. 
डॉ.शेषरावजी भोपळे यानी मार्गदर्शन करताना दहावी व बारावी नंतर उज्ज्वल भविष्य कोणत्या क्षेत्रात आहे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
  या कार्यक्रमाचे संचालन प्रा.सौ. कल्पनाताई इंगळे, निमकर्डे ताई यांनी केले. तर आभार प्रदर्शन ज्ञानदेव राजनकार यांनी केले.
   या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यानी अथक परिश्रम घतले.

Post a Comment

0 Comments