Advertisement

अहिल्यादेवी पुतळ्याचे‌ काम‌मार्गी न लाव‌ल्याने लोकप्रतिनिधींविषयी‌ नाराजी. अचानक झळकली स्मारकासंदर्भात बॅनर

*अहिल्यादेवी पुतळ्याचे‌  काम‌मार्गी न लाव‌ल्याने लोकप्रतिनिधींविषयी‌ नाराजी*.
------------------------------ *अचानक झळकली स्मारकासंदर्भात बॅनर* 
चांदवड -‌ मागील दहा वर्षांपासून विविध पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी आश्वासन देवून ही अहिल्यादेवींच्या राजधानीतच त्यांचा पुतळा न उभारल्या मुळे  जनमानसात लोकप्रतिनिधींविषयी‌ ‌नाराजीचा सुरू पहावयास मिळत आहे.
‌‌मुगल काळात हिंदू धर्म ‌रक्षणाचे मोठे कार्य ‌काश्मिर ते  कन्याकुमारी अहिल्यादेवींनी केले काशी विश्वेश्वर आजपासून सोरटी सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार त्यांनी केला.नाशिक‌‌ येथील गोदाघाट, त्र्यंबकेश्वर ‌येथील कुशावर्त ‌, इंदोर -चांदवड महामार्ग अशी अनेक लोकोपयोगी कामे‌ त्यांनी केली.चांदवड‌ ही अहिल्यादेवींची उपराजधानी ‌होती,येथील रेणुका देवी मंदिराला त्यांचा राजाश्रय होता ‌व आज ही रेणुका देवी मंदिराचे कामकाज ‌होळकर ट्रस्टच्या देखरेखीखाली पाहिलं जाते. चांदवड नगरीच्या जडणघडणीत व‌ विकासात अहिल्यादेवींचे मोठे योगदान असतांना त्यांच्या राजधानीतच त्यांचे स्मारक,पुतळा नसावे ह्याची   ‌सल जनतेला आहे.
२००४,२००९,२०१४  व २०१९ घ्या जाहिरनाम्यात तसेच वेळोवेळी शंब्द देवूनही‌‌ लोकप्रतिनिधींना  पुतळ्याचा विसर पडल्याचे दिसून येत‌‌ आहे.


यावरही कहर म्हणून की काय‌ तर‌ तरुणांनी‌ मनमाड चौफुलीवर बसवलेला  छोटेखानी ‌पुतळा हटविण्यासाठी‌ काही लोकप्रतिनिधींनी  प्रशासनावर दबाव आणला तर काहींनी बोटचेपी भुमिका घेतली याचा राग जनतेच्या मनात आहे व तो ते मतपेटीतून व्यक्त करण्याचे बोलत   आहेत. ज्या अहिल्यादेवींनी ‌गाव बसवले‌ त्यांच्या पुतळ्यासाठी हातभार जागा प्रशासनाने देवू‌ नये  ही शरमेची बाब आहे.‌ असे म्हटले जाते‌की इंदोर संस्थानचे‌‌ पुणे दरबारी टपाल पोहचवण्यासाठी इंदोर नाशिक मार्ग अहिल्यादेवींनी तयार केला होता तसेच नंतर भाविकांना त्र्यंबकेश्वर ‌दर्शन सुलभ व्हावे म्हणून नाशिक ते त्र्यंबकेश्वर रस्ता सुद्धा त्यांनीच बांधला.रस्ते विकासात एवढे योगदान असलेल्या अहिल्यादेवींच्या पुतळ्यासाठी  हायवे व सार्वजनिक बांधकाम विभागाला सुद्धा काही सोयरसुतक ‌नाही उलट राष्ट्रीय महामार्ग विभागाला पुढे करून  तात्पुरता बसविलेला पुतळा हटविण्यात अनेकांनी आपली ताकद खर्च केली,विषयाचे राजकारण केले.या सर्व ‌कटकारस्थानी मंडळीला येत्या विधानसभेत जोर का झटका देण्याचे जनतेने ठरवले आहे.

Post a Comment

0 Comments