Advertisement

अखिल महाराष्ट्र भाट समाजाची शेगांव येथे बैठक संपन्न!

*अखिल महाराष्ट्र भाट समाजाची शेगांव येथे बैठक संपन्न!*
*शेगांव:* दिनांक ३१ऑगस्ट २०२४ रोजी श्री क्षेत्र शेगाव येथे एक दिवसीय महाराष्ट्रातील सर्व भाट समाज पदाधिकाऱ्यांचे चर्चासत्र आयोजित केले होते.सदर बैठक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री विनायकराव सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. भाट समाजाचे भुषण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व पूजन करून बैठकीस सुरुवात झाली.
कार्यक्रमाची प्रस्तावना महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष *श्री दिपकजी साळवी* यांनी केली. राज्य स्तरीय संघटना "भाट समाज वेल्फेअर चॅरिटेबल ट्रस्ट"  या नावाने नोंदणी करण्यात आली. त्या नोंदणीपत्राचा अनावरण सोहळा पार पडला.
महाराष्ट्र प्रदेश महासचिव *श्री अरविंद शिंदे* यांची रोटरी क्लब ठाणे जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती झाली आहे. त्यांचा राज्य कार्यकारिणी तर्फे सत्कार करण्यात आला.
राज्य कार्यकारणीच्या १५ सदस्यांची नावे खालील प्रमाणे घोषणा करण्यात आली.श्री विनायकराव सूर्यवंशी -अध्यक्ष ,श्री अरविंद शिंदे      - महासचिव,श्री दिपक साळवी   -  कार्याध्यक्ष ,श्री यशवंत जगताप - खजिनदार ,श्री केशवराव दशमुखे - उपाध्यक्ष ,श्री जनार्दन परिहार - उपाध्यक्ष,श्री सुधाकर पुजारी- उपाध्यक्ष,श्री संतोष शिंदे-उपाध्यक्ष,श्री आबाजी बाविस्कर-सचिव , श्री राहुल चोपडे - सचिव ,श्री मधुकर पुजारी- सचिव ,श्री संजय भाट - सचिव , सौ. ज्योती निचळ-महिला संघटक,सौ. वैशाली बाविस्कर - महिला संघटक, सौ. अर्चना साळवी- महिला संघटक राज्य कार्यकारिणी तर्फे लवकरच एक वेबसाईट ची निर्मिती करून त्यामध्ये राज्यातील विविध जिल्ह्यातील भाट समाजातील उपक्रमांची माहिती प्रसारित करण्यात येईल.
 वंशावळ लेखन करणाऱ्या बांधवांच्या समस्या ऐकून त्यांना सर्वोतपरी सहाय्य करण्यासाठी राज्य कार्यकारिणी तर्फे संघटित प्रयत्न करण्याचे आश्वासन देण्यात आले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या आदर्श विचार महाराष्ट्र भर प्रसार करण्यासाठी गुरुकुंज आश्रम, मोझरी तर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध परीक्षा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात घेण्यासाठी श्री सुनिल भाऊ चव्हाण चंद्रपूर जिल्हा भाट समाज सहसचिव यांच्या मार्गदर्शना खाली घेण्यात येणार आहेत. त्यासाठी राज्य कार्यकारिणी तर्फे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येईल. राज्य कार्यकारिणी च्या तीनही महिला संघटकानी प्रत्येक जिल्हा कार्यकारिणीत महिलांना २०% आरक्षण असावे व प्रत्येक जिल्हा कार्यकारिणी कडून किमान ०२ महिला सदस्यांची नियुक्ती करावी अशी मागणी केली. या मागणीस सन्माननीय अध्यक्ष महोदयांनी राज्य कार्यकारिणी तर्फे संमती दिली. 
राज्य कार्यकारिणी तर्फे डिसेंबर २०२४ चा शेवटचा आठवडा किंवा जानेवारी २०२५ च्या प्रथम आठवड्या मध्ये राज्य व्यापी अधिवेशन आयोजित करण्याचा एकमुखी ठराव पास करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री योगेशराव नवले यांनी उत्तम रित्या केले.
सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी श्री राहुलजी चोपडे :- प्रदेश सचिव यांनी विशेष मेहनत घेतली.
 सदर एक दिवशीय चर्चेसाठी सर्व जिल्ह्यामधील जिल्हा अध्यक्षव जिल्हा सचिव यांनी उपस्थिती लावली. यामध्ये श्री गजाननराव जगताप, श्री विलासराव दशमुखे, श्री जयवंतराव पवार, श्री. रामभाऊ निचळ,श्री. विशालराव नवले, श्री प्रमोदराव बाविस्कर, श्री सुनिल राव चव्हाण,श्री. विजय देवबा चोपडे,श्री. तुकाराम सुरतकर,श्री दिपकराव क्षीरसागर, श्री सचिन चोपडे तसेच महिला सदस्य यांची उल्लेखनीय उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments