Advertisement

ई-केवायसी झालेल्या शेतकऱ्यांची रक्कम ७ दिवसांत जमा न झाल्यास शेतकऱ्यांचा आमरण उपोषणाचा इशारा बाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

*ई-केवायसी झालेल्या शेतकऱ्यांची रक्कम ७ दिवसांत  जमा न झाल्यास शेतकऱ्यांचा आमरण उपोषणाचा इशारा बाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन*
*ई-केवायसी झालेल्या शेतकऱ्यांची रक्कम ७ दिवसांच्या आत जमा करा - समाधान दामधर*
 दि. २३ सप्टेंबर ला जळगाव जामोद तालुक्यात गारपीट, अवकाळी पाऊस व वादळी वारे मुळे झालेल्या पिक नुकसान ग्रस्त ई-केवायसी झालेल्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई ची रक्कम खात्यात तत्काळ जमा करणे बाबत शेतकऱ्यांनी तहसिलदार व जिल्हाधिकारी यांना निवेदन व आमरण उपोषणाचा इशारा दिला.
सदर निवेदनात नमूद आहे की,
जळगाव जामोद तालुक्या मध्ये रब्बी २०२४ मध्ये झालेल्या वादळी वारेसह गारपीट व  अवकाळी पावसामुळे  तालुक्यातील रब्बी शेत पिकांचे अतोनात नुकसान झालेले होते, सदर पिक नुकसानीचे पंचनामे आपल्या कार्यालया द्वारे केलेले असुन सदर पिक नुकसानीची रक्कम प्राप्त करण्या करिता शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली आहे, परंतु अजून पर्यंत सदर लाभार्थी शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची रक्कम खात्यात जमा झालेली नाही.
तरी जळगाव जामोद तालुक्यात गारपीट, अवकाळी पाऊस व वादळी वारे मुळे झालेल्या पिक नुकसान ग्रस्त ई-केवायसी झालेल्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई ची रक्कम खात्यात तत्काळ जमा करण्यात यावी. सदर रक्कम ७ दिवसांचे आत जमा न झाल्यास आम्ही खाली सही करणार शेतकरी आमरण उपोषण व इतर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल. 
सदर रक्कम ७ दिवसांचे आत जमा न झाल्यास आम्ही खाली सही करणार शेतकरी आमरण उपोषणास बसणार असुन  सदर निवादेनासच उपोषणाची नोटीस समजावी. तहसिल कार्यालयाच्या दिरंगाई मुळे एक ही शेतकरी मदती पासुन वंचित राहिल्यास उपोषण व लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल व प्रशासन म्हणून याची पूर्ण जबाबदारी आपली राहिल.
यावेळी समाधान दामधार, विकास धुळे, निखील काळपांडे, प्रेमसिंग पवार, रमेश मिसाळ, राहुल सुरेश धर्मे, रुख्मिणी मारोती सातपुते, महादेव मिसाळ,  राजाराम धुळे, पुंडलीक धुळे, संजय धुळे, प्रकाश धुळे, यशोधा गजानन काळपांडे, सुनिलशिंग राजपूत, गजानन कपले, अनंता हागे, सुरेश धर्मे व अनेक शेतकरी उपस्थीत होते

Post a Comment

0 Comments