महावितरण विभागाची उदासीनता!
जळगाव जामोद :
सूनगाव येथे वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने महावितरण विभागाचे अधिकारी व कर्मचारी वीज खंडित होण्याबाबत पूर्णपणे बेफिकीर असल्याचे दिसून येत आहे.
वीज खंडित होणे ही दिवसातून एकदा किंवा दिवसभराची ओरड नसून कधी-कधी दिवसातून दोन ते तीन वेळा वीज खंडित होण्याचे प्रकार झाले आहेत .पण कधी महावितरण विभागाचे अधिकारी व कर्मचारी त्यांच्या कुंभकर्ण झोपेतून जागे होतील का त्यांना जनतेची पर्वा नाही.
वीज विभाग बिल वसुलीत कोणतीही कसर सोडत नाही, तर सेवा देण्यात एवढा बेफिकीर का, असा सवालही नागरिक उपस्थित करत आहेत.
पावसाळा सुरू असतानाही तालुक्यात कमालीची उकाडा जाणवत असून थोडा पाऊस आला म्हणजे वीज गेलीच समजा, रात्रभर लाईट बंद राहते या उन्हामुळे लहान मुले, वयोवृद्ध, तरुण असे सर्वच त्रस्त झाले आहेत या वीज कपातीबाबतच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांच्या समस्या वाढल्या आहेत, असेही नागरिकांकडून बोलले जात आहे. याकडे महावितरण विभागाच्या उच्च अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन ही समस्या त्वरित दूर करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
*वीज वसुली पूर्ण सेवा अपयश*
एकीकडे विजेचे दर दिवसेंदिवस वाढत असून वीज विभाग बिल वसुलीत कोणतीही कसर सोडत नाही, मग नागरिकांना सुविधा देण्याबाबत उदासीनता का? असा सवालही नागरिक करत आहेत.
नागरिकांनी वीज विभागाच्या संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला फोनद्वारे वीज खंडित होण्याचे कारण विचारले तर त्यांना नेहमीप्रमाणे एकच उत्तर मिळते की बिघाड झाला आहे की मग वीजेचा काय दोष आहे इतके दिवस उलटूनही विभागाचे लक्ष नाही, असा सवालही नागरिक करत आहेत.
0 Comments