Advertisement

१ ऑक्टोंबरला शेतकऱ्यांचा तहसिल कार्यालयात ठिय्या.!

१ ऑक्टोंबरला शेतकऱ्यांचा तहसिल कार्यालयात ठिय्या.! 

जळगांव (जा) :- दि २५ सप्टेंबर २०२४ रोजी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी मा.तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये २२ जुलै रोजी झालेल्या महापुरात शेतकऱ्याची शेती पूर्णतः खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना वर्ष उलटूनही आर्थिक मदत मिळाली नाही त्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी. तसेच फेब्रुवारी २०२४ मध्ये जळगाव जा तालुक्यात गारपीट झाल्याने शेतकऱ्याच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले गारपीट ग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी, आणि २०२३ मध्ये शेतकऱ्यांना हेक्टरी ५ हजार रुपये अनुदान मदत देण्याचे शासनाने आश्वासन दिले होते परंतु आजपावेतो शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही, त्या शेतकऱ्यांना सात दिवसाच्या आत अनुदान शेतकऱ्याच्या खात्यात वर्ग करण्यात यावे. आणि ई पिक पाहणीची अट शिथिल करण्यात यावी.तसेच २२जुलै २०२३ मध्ये सानुग्रह निधीमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या संबंधित कर्मचारी अधिकाऱ्यांवर चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी. अन्यथा  १ ऑक्टोंबर २०२४ रोजी तहसिल कार्यालयात कार्यालयात नुकसानग्रस्त शेकडो शेतकऱ्यांसह ठिय्या आंदोलन करण्याचे निवेदनात नमूद केले आहे त्यावेळी सुनिल बोदडे, रतन नाईक, प्रकाश भिसे, अँड गव्हांदे, आजम कुरेशी, प्रशांत अवसरमोल
संतोष पवार, गुलाबराव आठवले, अमोल तायडे, परमेश्वर कोकाटे आनंद गवई, रोशन तायडे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments