📎जळगांव (जा) :- दि १ ऑक्टोंबर २०२४ रोजी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी मा.तहसीलदार यांच्या दालनात वंचित बहुजन आघाडीने केले ठिय्या आंदोलन या आंदोलनात २२ जुलै रोजी झालेल्या महापुरात शेतकऱ्याची शेती पूर्णतः खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना वर्ष उलटूनही आर्थिक मदत मिळाली नाही त्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी. तसेच फेब्रुवारी २०२४ मध्ये जळगाव जा तालुक्यात गारपीट झाल्याने शेतकऱ्याच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले गारपीट ग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी, आणि २०२३ मध्ये शेतकऱ्यांना हेक्टरी ५ हजार रुपये अनुदान मदत देण्याचे शासनाने आश्वासन दिले होते परंतु आजपावेतो शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही, त्या शेतकऱ्यांना सात दिवसाच्या आत अनुदान शेतकऱ्याच्या खात्यात वर्ग करण्यात यावे. आणि ई पिक पाहणीची अट शिथिल करण्यात यावी. तसेच २२जुलै २०२३ मध्ये सानुग्रह निधीमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या संबंधित कर्मचारी अधिकाऱ्यांवर चौकशी करून कार्यवाही करावी या मागण्यासाठी बहुसंख्य पूरग्रस्त शेतकरी व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी या आंदोलनात सहभागी होते या आंदोलनामध्ये माननीय तहसीलदार साहेब यांनी सर्व मागण्या सात दिवसात मार्गी लावू असे लेखी आश्वस्त केले, त्यानंतर आंदोलनात सहभागी असलेले सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी ठीय्या आंदोलन स्थगित केले या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉ.सतीश शीरेकार अरुण पारवे, सुनिल बोदडे, रतन नाईक, प्रकाश भिसे, अनिल रानित, आजम कुरेशी, प्रशांत अवसरमोल, विजय सातव संतोष पवार, विजय तायडे, गुलाबराव आठवले, अमोल तायडे, रणजित डोंगरदिवे, आनंद गवई, रोशन तायडे, भागवत पारसकर, योगेश म्हासळ वासुदेव तायडे अरुण उगले आदी उपस्थित होते.
0 Comments