Advertisement

महाराष्ट्र सरकारचे श्राद्ध आंदोलन करुण शेतक-यांच्या मागण्या बाबत रक्ताने सह्या केलेले

महाराष्ट्र सरकारचे श्राद्ध आंदोलन करुण शेतक-यांच्या  मागण्या  बाबत रक्ताने सह्या केलेले निवेदन सादर..

 जळगाव जामोद प्रतिनिधी 

महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यां मार्फत  उप-विभागीय अधिकारी, कार्यालया समोर  आज दिनांक एक ऑक्टोंबर रोजी महाराष्ट्र सरकारचे पिंड पाडून सरकारचा निषेध करत श्राद्ध आंदोलन केले व  रक्ताने सह्या केलेले  निवेदन सादर केले  सदर निवेदनात असे नमूद आहे की  आम्ही खालील  सह्या  करणार आपल्या निदर्शनास आणु इच्छितो की. महाराष्ट्र सरकार जाणीव पूर्वक शेतकऱ्यांवर अन्याय करत असुन शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे.आज आम्ही उप-विभागीय अधिकारी, जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा यांचे कार्यालाया समोर शेतकरी विरोधी महाराष्ट्र सरकारचे विरोधात श्राद्ध आंदोलन केलेले असुन जळगाव जामोद मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या न्यायहक्काच्या खालील प्रमुख मागण्यांबाबत रक्ताने सह्या केलेले निवेदन सादर करित आहोत.शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळालीच पाहिजे. सोयाबीन, कापूस, कांदा व सर्व शेतमालाला योग्य भाव मिळालाच पाहिजे शेतमालावरची निर्यात बंदी उठवली पाहिजे.शेतकऱ्यांना न्याय हक्काचा पिक विमा मिळालाच पाहिजे. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेली नुकसान भरपाई शेतकऱ्यांना तात्काळ मिळाली पाहिजे.महापुरामुळे खरडून गेलेल्या जमिनीचे व पीक नुकसानीचे तसेच व्यावसायिकांचे प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढणे बाबत.रब्बी २०२४ मध्ये गारपीट व अवकाळी पावसाचे नुकसान भरपाई ची उर्वरीत यादी तत्काळ प्रसिद्ध करणे.रब्बी २०२४ मध्ये गारपीट व अवकाळी पावसाचे ५०,००० पेक्षा अधिकची रोखलेली नुकसान भरपाई ची रक्कम तत्काळ खात्यात जमा करणे.संत्रा फळगळ करिताच्या पंचनामा करीता लावलेल्या जाचक अटी कमी करून सरसकट संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना पंचनामा करून नुकसान भरपाई देणे बाबत येणाऱ्या रब्बी पिकांसाठी दिवसा विद्युत पुरवठा व्हायला पाहिजे. गोमाल येथील मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळाली पाहिजे जळगाव जामोद मतदारसंघांमध्ये शाळा तसेच संपूर्ण शासकीय कार्यालयामध्ये कर्मचारी कमी प्रमाणात असून ते तात्काळ मिळाले पाहिजे. अशा मागण्यांचे निवेदन सादर केले. या निवेदनावर अविनाश उंबरकर, प्रसेंजित पाटील, डॉ. संदीप वाकेकर, डॉ. स्वातीताई वाकेकर, सौ ज्योतीताई ढोकणे, गजानन वाघ, तुकाराम काळपांडे, ओ. पी. तायडे, गजानन साबळे, अर्जुन घोलप, अनिल इंगळे ॲड. मिलिंद खान, ॲड.रतन इंगळे, प्रवीण भोपळे, निशिकांत देशमुख,  यांच्यासह असंख्य महाविकास आघाडीच्या  कार्यकर्त्यांनी या निवेदनावर रक्ताने सह्या करून महाराष्ट्र सरकारचा निषेध करीत श्राद्ध आंदोलन केले.

Post a Comment

0 Comments